आणखी एक परिवार अंधश्रद्धेचा बळी! दोघांचा मृत्यू, 2 बेशुद्ध आणि दोघे झाले वेडे; काय आहे प्रकरण?

Chhattisgarh crime:  कधीकाळी सुखी  म्हणवणारा परिवार अंधश्रद्धेला बळी पडला आहे. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 19, 2024, 01:58 PM IST
आणखी एक परिवार अंधश्रद्धेचा बळी! दोघांचा मृत्यू, 2 बेशुद्ध आणि दोघे झाले वेडे; काय आहे प्रकरण? title=
अंधश्रद्धेचा बळी

Chhattisgarh crime: भुताटकी, भानामती, देवदेवस्कीला घाबरुन बाबा-बुवांच्या नादाला लागून आख्खच्या आख्खं कुटुंब संपल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. पण अजूनही बरेचजण यातून काही बोध घेताना दिसत नाहीत. त्यामुळे अंधश्रद्धेमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात आता आणखी एका परिवाराची भर पडली आहे. छत्तीसगडमधून हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे राहणारा कधीकाळी सुखी  म्हणवणारा परिवार अंधश्रद्धेला बळी पडला आहे. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

छत्तीसगड येते एकाच परिवारातील 6 ते 7 जणं काहीही न खाता-पिता जप करत होते. याची माहिती पोलिसांन मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले आणि समोरचा प्रसंग पाहून त्यांनाही धक्का बसला. घटनास्थळी संपूर्ण कुटुंब आजारी पडले होते. यांच्यासोबत काहीतरी वाईट घडल्याचा संशय पोलिसांना आला. 

उध्वस्त झाला परिवार 

पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. येथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर दोघेजण बेशुद्ध पडले होते. एवढेच नव्हे तर कुटुंबातील आणखी दोघांची मानसिक स्थिती बिघडली होती. बेशुद्ध पडलेल्या दोघांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्तीसगढच्या सक्ती जिल्ह्यातील तांदुलडीह गावात हा प्रकार समोर आला. संपूर्ण एक आठवडा हा परिवार गावात कोणाच्याच नजरेसपडला नाही. यानंतर गाववाल्यांनी याची तक्रार पोलिसांत केली. 

7 दिवस बाबाच्या नावाचा जाप 

तांदुलडीह गावामध्ये दोन भावांच्या मृत्यूने संपूर्ण गावात भीती पसरली आहे. पोलिसांसह गावकरी घरात शिरले तेव्हा त्यांना एकएका गोष्टीचा उलगडा होत गेला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन युवकांचा मृत्यू झाला होता. हे दोघे सख्ये भाऊ होते. याच परिवारातील दोघेजण शुद्धीवर नव्हते. त्यांची दयनीय अवस्था झाली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानसिक स्थिती ठीक नसलेल्या दोघांवर उपचार सुरु आहेत.