सरकारविरोधात राष्ट्रवादीचा राज्यभर 'हल्लाबोल'

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरलं आहे. सरकारविरोधात राष्ट्रवादीनं हल्लाबोल आंदोलन केलं आहे. 

Updated: Nov 27, 2017, 08:39 PM IST
सरकारविरोधात राष्ट्रवादीचा राज्यभर 'हल्लाबोल' title=

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरलं आहे. सरकारविरोधात राष्ट्रवादीनं हल्लाबोल आंदोलन केलं आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं. 

शेतकरी हवालदिल झालाय, सतत नुकसान होतंय, महागाईचा भस्मासूर झालाय मात्र तरीसुद्धा सरकार शांत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. औरंगाबादच्या क्रांती चौक पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. प्रश्न न सोडवल्यास आंदोलनाची धार वाढवणार असा इशाराही मुंडे यांनी दिलाय.

सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. भाजप हा आता जुना पक्ष राहिला नाही. भाजपमध्ये आता दोन नंबरची कामं करणारे गुन्हेगार प्रवेश करत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.