मोदीं विरोधात सगळे विरोधक एकत्र येण्याचा गिअर मी टाकला- राज ठाकरे

अधीसूचना रद्द झाल्याची शिवसेना खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करतेय अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

Updated: May 25, 2018, 03:10 PM IST

मुंबई : कर्नाटक निकालानंतर  मोदीं विरोधात जे सगळे विरोधक एकत्र आलेत याचा गिअर मी टाकला आणि मग सगळे विरोधक एकत्र आल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. तसेच यावेळी कोकणाती नाणार प्रकल्पावरही त्यांनी भाष्य केले.  नाणार प्रकल्पाची आवश्यकता कोकणात नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अधीसूचना रद्द झाल्याची शिवसेना खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करतेय अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. अशा खोट बोलणाऱ्यांचं काय करायचं राज ठाकरे यांचा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.