'नाणार होणार की जाणार याची कोकणी माणूस वाट पाहणार - तावडे

मुंबई : 'नाणार होणार की जाणार याची कोकणी माणूस वाट पाहणार' असं सूचक विधान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या  राजापूर तालुक्यातील आडिवरे इथे नव्याने बांधण्यात आलेल्या तावडे भवनचं उद्घाटन, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील नाणारबाबत बोलण्याची संधी सोडली नाही. मुख्यमंत्र्यांकडे नाणार रद्द करण्याबाबत तावडे यांनी शब्द टाकावा असा गुगली, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यावेळी टाकला.