Mumbai Crime News : मुंबईतून धक्कादायक बातमी, कपाटात ठेवला प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह

Mumbai Crime News : मुंबईतील पेरु कंपाऊंड परिसरातली धक्कादायक घटना उघड झाली आहे. महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन कपाटात बंद करुन ठेवला होता. तिच्या 22 वर्षांच्या मुलीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 

Updated: Mar 15, 2023, 12:05 PM IST
Mumbai Crime News : मुंबईतून धक्कादायक बातमी, कपाटात ठेवला प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह title=

Mumbai Crime News : धक्कादायक बातमी मुंबईतून. लालबागमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेरु कंपाऊंड परिसरातली ही धक्कादायक घटना आहे. महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन कपाटात बंद करुन ठेवला होता. 53 वर्षांच्या या महिलेची तिच्या 22 वर्षांच्या मुलीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. हत्येचं नेमकं काय कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

मुलीने हत्या केल्याचा संशय 

तिच्याच मुलीने हत्या केल्याचा संशय आहे. या महिलेचा मृतदेह प्रथम प्लास्टिकच्या पिशवीत भरुन नंतर कपाटात बंद करुन ठेवण्यात आला.  याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी कपाटातील बॅग बाहेर काढली. याप्रकरणी पोलीस मृत महिलेच्या मुलीची चौकशी करत आहेत. मुलीनेच हत्या करु मृतदेह पॅक करुन कपाटात लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी 22 वर्षीय मुलीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे असून मुलीची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मृत महिलेची ओळख पटली

मृत महिलेची ओळख पटली आहे. पोलीस तिच्या मुलीकडे अधिक तपास करत आहेत. मुलीनेच आईची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महिलेच्या हत्येमागचं नेमकं कारण पोलीस घेत आहेत, अशी माहिती डीसीपी प्रवीण मुंडे यांनी दिली. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस तिची चौकशी करत आहेत. त्यामुळे या घटनेत आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबई जवळील पालघरमध्ये एका प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता. त्यानंतर त्यांने पोबारा केला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच रेल्वेतून पळून जाणारा आरोपी हार्दिकला अटक केली होती. पालघरमधील तुळींज परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. हे दोघे प्रेमीयुगल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. हार्दिक काहीही काम करत नव्हता. तर त्याची प्रेयसी ही परिचारिका होती. तिच्याच पैशावर तो जगत होता.