मग झक मारायला निवडणुका घेतात – राज

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मनसेला परवानगी नाकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

Updated: Feb 3, 2012, 07:00 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मनसेला परवानगी नाकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

 

शिवाजी पार्कवर यापूर्वी शिवसेनेचा दसरा मेळावा होऊ शकतो, त्यावेळी राज्य सरकारमध्ये सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने शिवसेनेला परवानगी देण्यास हायकोर्टात सांगितले होते. आता राज्य सरकार परवानगी देऊ नये, असे सांगत आहे. त्यामुळे हे अनाकलनीय आहे, की राज्य सरकार सांगते तसा निकाल हायकोर्टकडून दिला जातो. हायकोर्ट किंवा निवडणूक आयोग या संस्थांकडून पारदर्शक कारभार व्हावा, ही अपेक्षा असते, मात्र तो होत नाही, या बद्दल कोणी बोलूही नाही, का, ही काय मोगलाई आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी हा मुद्दा लक्षात घेऊन सभेला परवानगी द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. न्यायदेवतेच  एक पारडं एका बाजूला झुकलेलं आहे, अशी टीप्पणी राज ठाकरे यांनी यावेळी केली.

 

हायकोर्टाने आम्हांला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी नाकारली, पण सभा कुठे घ्यायच्या हे सांगितले नाही. शिवाजी पार्कवर घेऊ नये, आझाद मैदानावर घेऊ नये, गिरगाव चौपाटीवर घेऊ नये, अशी बंधन लादतात. सांगतील एमएमआरडीए मैदानावर घ्या, अरे कुणी कुत्रं तरी येतं का या ठिकाणी असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

प्रत्येक ठिकाणी सायलेन्स झोन करायचं असेल, तर निवडणुका रद्द करा. जाहिरात करताना विरोधी पक्षावर टीका करून नका, अशा प्रकारे सर्वच बाजुंनी बांधुन ठेवायचे आणि निवडणुकांना सामोरे जा, अशी अडवणूक केली जाते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मला सभेला परवानगी नाकारली म्हणून हा प्रश्न उपस्थित केला नाही. पण लोकशाहीत कोणालाही कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे. आता जर शिवाजी पार्कमध्ये सभा घेऊ दिली नाही, तर आम्ही रस्त्यावर सभा घेऊ असा इशारा राज यांनी यावेळी दिला.

 

शांततेच्या मार्गाने निवडणुका व्हाव्यात असे आम्हांलाही वाटते, मात्र, अशी आडकाठी करून शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

 

संबंधित बातम्या -