२० वर्षाच्या तरुणीने केला ७० वर्षाच्या पुरुषासोबत विवाह

भारतात असं म्हटलं जातं की, रिश्ते तो ऊपर से बनकर आते है. पण काही नाते असे असतात की जे आपण स्वत: बनवतो. असंच एक नातं बिहारमधल्या गया जिल्ह्यात बनलं आहे. २० वर्षाच्या लक्ष्मीने स्वइच्छेने ७० वर्षाच्या राम आशिष यांच्यासोबत विवाह केला आहे.

Updated: May 18, 2016, 07:16 PM IST
२० वर्षाच्या तरुणीने केला ७० वर्षाच्या पुरुषासोबत विवाह title=

पटना : भारतात असं म्हटलं जातं की, रिश्ते तो ऊपर से बनकर आते है. पण काही नाते असे असतात की जे आपण स्वत: बनवतो. असंच एक नातं बिहारमधल्या गया जिल्ह्यात बनलं आहे. २० वर्षाच्या लक्ष्मीने स्वइच्छेने ७० वर्षाच्या राम आशिष यांच्यासोबत विवाह केला आहे.

जेव्हा ही दोघं कोर्टात पोहोचले तेव्हा तेथे उपस्थित अनेकांच्या भूवया उंचावल्या. कोर्टात विवाह केल्यानंतर दोघेही खूप आनंदीत दिसत होते. संपूर्ण रितीरिवाजाने त्यांनी विवाह केला. राम आशिष यांना मुलगा आणि नातू देखील आहे. पण तरी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

राम आशिष यांच्या पत्नीचा मागच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलगा आणि सूनेसोबत पटत नसल्याने त्यांनी दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. 

लक्ष्‍मी देवी हिचं देखील या आधी लग्न झालं होतं. त्यानंतर एक मुलगा देखील झाला पण त्यानंतर तिच्या पतीने तिला सोडून दिलं. त्यामुळे तिनेही दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा विवाह सध्या संपूर्ण बिहारमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.