राजनाथ सिंह भडकले, दिली भारत विरोधींना तंबी

भारताच्या भूमीवर भारताविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिला. काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा थेट आरोपही सिंह यांनी केला. 

Updated: Aug 10, 2016, 07:59 PM IST
राजनाथ सिंह भडकले, दिली भारत विरोधींना तंबी  title=

नवी दिल्ली, : भारताच्या भूमीवर भारताविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिला. काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा थेट आरोपही सिंह यांनी केला. 

नवाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

जगातली कोणतीही ताकद आमच्यापासून जम्मू आणि काश्मीर हिसकावून घेऊ शकत नाही, असेही राजनाथ सिंग यांनी नवाझ शरीफ यांनी यूएन लिहिलेल्या पत्राला सडेतोड उत्तर देताना बजावलं आहे. 

काश्मीरमधील तरूणांना संदेश 

भारत असा एकमेव देश आहे जिथे सर्व धर्मीय लोकांच्या भावनाचा आदर राखला जातो. इस्लाम धर्म हा कधीही हत्या आणि कुणाला इजा पोहचवण्यासाठी परवानगी देत नाही असा सल्ला राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील तरुणांना दिला. 

भारतविरोधी नारेबाजी खपवून घेतली जाणार नाही...

तसंच आपल्या धर्माचा प्रचार करण्यास कुणीही आडकाठी आणू शकत नाही. पण आपल्याच देशात आपल्या मातृभूमीवर देशाविरोधात नारेबाजी खपवून घेतली जाणार नाही. काश्मीरमधील जनतेनं अशा नारेबाजी करणार्‍या लोकांना थांबवलं पाहिजे असंही सिंह म्हणाले.

१२ ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक 

काश्मीरच्या प्रश्नावर येत्या 12 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे अशी माहितीही सिंह यांनी दिली.