रामदास कदम यांचा आमिरला सवाल?

आमिर खान ने केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते रामदास कदम जोरदार टीका केली आहे. आमिरला सुरक्षिततेची एवढीच भीती वाटत असेल तर त्यांनी कुटुंबासह सरळ पाकिस्तानात राहायला जावं असा खोचक सल्ला कदम यांनी आमिरला दिलाय.

Updated: Nov 24, 2015, 09:05 PM IST
रामदास कदम यांचा आमिरला सवाल? title=

मुंबई : आमिर खान ने केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते रामदास कदम जोरदार टीका केली आहे. आमिरला सुरक्षिततेची एवढीच भीती वाटत असेल तर त्यांनी कुटुंबासह सरळ पाकिस्तानात राहायला जावं असा खोचक सल्ला कदम यांनी आमिरला दिलाय.

तसेच आम्ही तुमच्यावर प्रेम केलं, तुम्ही मोठे झाले, तर आम्ही सापाला दुध पाजलं की काय? असं रामदास कदम यांनी म्हटलंय.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमीरचं विधान अतिरेक असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी मौन सोडलं पाहिजे, असंही त्यांचं म्हणणं आहे.

आमीर खानला रामदास कदम काय म्हणाले, पाहा...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.