नादाला लागू नका, उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

वांद्र्यात मिळालेल्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शिवसेनेला नादाला लागू नका असा इशारा नारायण राणेंना दिला. तसंच एमआयएमचा प्रभाव ओसरल्याचंही त्यांनी नमूद केलं.  

Updated: Apr 15, 2015, 04:39 PM IST
नादाला लागू नका,  उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला title=

मुंबई : वांद्र्यात मिळालेल्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शिवसेनेला नादाला लागू नका असा इशारा नारायण राणेंना दिला. तसंच एमआयएमचा प्रभाव ओसरल्याचंही त्यांनी नमूद केलं.  

नारायण राणेंच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, नारायण राणे यांनी बेडक्या फुगवून दाखवून अंगावर येऊ नये. शिवसेना वाघ आहे वाघाच्या नादाला लागू नये.

वोट बँकेचे राजकारण चालतं, मतदारांना भ़डकविण्याचे राजकारण चालते, त्याला निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी योग्य उत्तर दिले आहे. नको त्याच्या मागे लागण्यापेक्षा आपला कोण आणि परका कोण हे त्यांनी ओळखलं तर सर्व प्रश्न सुटतील, असेही एमआयएमच्या पराभवावर बोलताना सांगितले. 

हा विजय मतदारांचा आणि शिवसैनिकांचा असल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले. 

पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले - व्हिडिओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.