भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे: ऑस्ट्रेलियासमोर २५३ रन्सचे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने २५२ रन्सपर्यंत मजल मारली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 21, 2017, 06:05 PM IST
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे: ऑस्ट्रेलियासमोर २५३ रन्सचे आव्हान  title=

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने २५२ रन्सपर्यंत मजल मारली आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या टीमने ५० ओव्हर्समध्ये २५२ रन्स केले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २५३ रन्सचे आव्हान आहे.

टीम इंडियातर्फे ओपनिंगसाठी मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणेने ६४ बॉल्समध्ये ५५ रन्स केले. मात्र, रोहित शर्माला चांगली बॅटिंग करण्यात अपयश आलं आणि तो केवळ ७ रन्स करुन माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने अजिंक्य रहाणेला चांगली साध दिली.

विराट कोहलीने १०७ बॉल्समध्ये ९२ रन्स केले ज्यामध्ये ८ फोरचा समावेश आहे. पण त्यानंतर एकाही बॅट्समनला मोठा स्कोर उभारता आला नाही. अखेर टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये २५२ रन्स केले.