भारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये. 

Updated: Jul 20, 2017, 03:45 PM IST
भारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय title=

डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये. 

अद्यापही मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने टॉसही होऊ शकलेला नाहीये. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासमोर आज ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करणे गरजेचे आहे. 

याआधी न्यूझीलंडला १८६ धावांनी हरवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. 

भारताचा सेमी फायनलपर्यंतचा प्रवास 

भारत विरुद्ध इंग्लंड
भारताची इंग्लंडवर 35 रन्सने मात

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारतीय टीमचा 7 विकेट्सनी विजय

भारत विरुद्ध पाकिस्तान
पाकिस्तानचा 95 रन्सने धुव्वा

भारत विरुद्ध श्रीलंका
16 रन्सने श्रीलंकेवर मात

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
115 रन्सने भारताचा पराभव

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाकडून 8 विकेट्सने पराभूत

भारत विरुद्ध न्यूझीलंड
न्यूझीलंडचा 186 रन्सने पराभव