Rohit Sharma Video : 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण', रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या

IND vs BAN : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

Updated: Nov 2, 2022, 09:28 AM IST
Rohit Sharma Video : 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण', रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या title=
Rohit Sharmas Video shocking statement It is difficult to be the captain of Team India and India Vs Bangladesh 2 November 2022 nmp

T20 World Cup : टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमध्ये आज चौथा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अशात रोहित शर्माचं हे वक्तव्य सगळ्यांसाठी आश्चर्यकारक आहे. 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण' असं मोठं वक्तव्य खुद्द रोहित शर्माने केलं आहे. 

'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण'

झालं असं की, कर्णधार रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सवर दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केलं. या मुलाखतीच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मुलाखतीत रोहित म्हणाला की, टीम इंडियाचा कर्णधार बनणे सोपे काम नाही. संघातील प्रत्येक खेळाडूची मानसिकता वेगळी आणि स्वभाव वेगळा असतो. कर्णधार म्हणून अनेक गोष्टी कशा हाताळतो, हे रोहितने सांगितलं आहे. (Rohit Sharmas  Video shocking statement It is difficult to be the captain of Team India and India Vs Bangladesh 2 November 2022 nmp)

हे पण वाचा -  T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा

रोहितने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'वेगवेगळ्या लोकांना हाताळावे लागते कारण लोक एकसारखे नसतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वकाही सोबत घ्यावे लागेल आणि मग तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देतात यावर सगळं अवलंबून आहे.

तो पुढे म्हणाला की, 'कर्णधार असताना मी शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला महत्त्व देणं हे महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी या संघाचा एक भाग आहे आणि एक महत्त्वाचा खेळाडू आहे. म्हणून जेव्हा कोणी तुमच्याकडे समस्या घेऊन येतो, तेव्हा तुम्हाला त्यांचं ऐकावं लागेल आणि त्या गोष्टीसाठी सर्वोत्तम उपाय कोणता आहे हे शोधावं लागेल आणि ते संघातील इतक खेळाडूंना सांगावं लागेल. कर्णधारपद करताना ही माझ्यासाठी मोठी शिकवण आहे, असं मला वाटतं.