मनमोहन सिंग

मीडियाने सनसनाटी बातम्या देऊ नये- मनमोहन सिंग

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर होणारे आरोप, त्यानंतर मनमोहन सिंग यांना विरोधकांनी `टार्गेट` करणं, ह्या साऱ्याचं खापर मनमोहन सिंग यांनी मीडियावर फोडलं आहे.

Sep 13, 2012, 04:49 PM IST

पंतप्रधानांची संपत्ती दुप्पट, मंत्र्यांची कोटींची उड्डाणे

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची संपत्ती १० कोटी ७३ लाख रुपयांची आहे. विशेष म्हणजे त्यांची संपत्ती गेल्या वर्षाभरात दुप्पट झाली आहे.

Sep 10, 2012, 09:16 AM IST

`मौन`मोहन सिंगच भ्रष्टाचारी- वॉशिंग्टन पोस्ट

‘हजारों जवाबों से बेहतर है मेरी खामोशी’ म्हणणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खामोशीवर प्रख्यात अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही टीकेची झोड उठवली आहे. मनमोहन सिंगच भारतातील भ्रष्ट सरकारचे प्रमुख आहेत, असा सनसनाटी आरोप ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.

Sep 5, 2012, 01:30 PM IST

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन - पंतप्रधान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी लवकरात लवकर जमीन देण्यात येईल, असं आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिलंय. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आज मुंबई दौ-यावर आहेत.

Aug 18, 2012, 06:19 PM IST

पंतप्रधानांना पाकिस्तान दौऱ्याचं निमंत्रण

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकिस्तान दौऱ्याचं आमंत्रण दिलंय. झरदारी यांनी या निमंत्रणाची औपचारिकरित्या घोषणाही केलीय.

Jul 28, 2012, 11:53 AM IST

काय झालं काँग्रेस-राष्ट्रवादीत डील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी अखेर दूर झालीय. पंतप्रधान, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतला तिढा अखेर सुटला. ‘यूपीए’मध्ये अधिक समन्वय असावा, ही पवारांची मागणी या बैठकीत मान्य करण्यात आलीय.

Jul 26, 2012, 07:54 AM IST

मनमोहन सिंग तर 'जोकर' - राजीव गांधी

पंतप्रधान मनमोहन सिंग अर्थतज्ञ म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्याच मनमोहन सिंग यांना खुद्द माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी 'जोकर' असे संबोधले होते.

Jul 21, 2012, 12:34 PM IST

नेमकं काय हवंय शरद पवारांना...

आपली नाराजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. या पत्रातून शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या तीन मागण्याही मांडल्यात. यातलीच एक मागणी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कार्यशैलीत बदल घडवण्याच्या सूचना करणं.

Jul 20, 2012, 09:29 PM IST

पंतप्रधानांच्या मदतीला धावले टाटा

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर अनेक स्तरांवरून टीकेची उठल्यानंतर ‘टाटा ग्रुप’चे अध्यक्ष रतन टाटा हे मनमोहन सिंग यांच्याबाजुने उभे ठाकलेत. गुरुवारी, रतन टाटा यांनी पंतप्रधानांचं जोरदार समर्थन करत त्यांना पाठिंब्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय.

Jul 19, 2012, 01:44 PM IST

'मनमोहन सिंग : सोनियाज् पुडल'

‘अंडरअचिव्हर’ अशी पदवी मिळालेल्या भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लंडनच्या एका वृत्तपत्रानं ‘इंडियाज सेव्हिएर ऑर सोनियाज पुडल’ अशी उपाधी बहाल केलीय.

Jul 17, 2012, 10:19 AM IST

'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं'

'जर सोनियांना पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना कुणीच रोखू शकलं नसतं,' अशी स्पष्टोक्तीच ए. पी. जे अब्दुल कलाम या पुस्तकात दिलीय.

Jun 30, 2012, 11:59 AM IST

भारत झाला उदार, युरोपातील देशांना मदत

भारतावर कर्जाचा डोंगर असला तरी कर्जाच्या सापळ्यात सापडलेल्या १७ युरोपीय देशांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निधीसाठी भारत १० अब्ज डॉलरची मदत करणार आहे. भारताबरोबरच ब्रिक गटाचे सदस्य असलेल्या पाच देशांनी या निधीसाठी मदत करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

Jun 20, 2012, 04:57 PM IST

'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं नाव राष्ट्रपतीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 14, 2012, 02:36 PM IST

'पंतप्रधानांबद्दल आदर, पण चौकशी व्हायलाच हवी'

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्यानंतर टीम अण्णानं या आरोपांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केलीय. इतकंच नाही तर, हे आरोप खोटे ठरले तर आपल्याला खूप आनंद होईल, असंही टीम अण्णानं म्हटलंय.

May 30, 2012, 06:48 PM IST

पाण्याचा प्रश्न गंभीरच आहे- पंतप्रधान

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज भारत जल सप्ताहाचं उदघाटन केलं. देशाच्या लोकसंख्येनुसार पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि दिवसेंदिवस ती कमीच होत चालली आहे. जगातली १७ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात आहे फक्त आणि चार टक्के पाण्याची उपलब्धता आहे.

Apr 10, 2012, 08:27 PM IST