रायगड

रायगडवर शिवरायांच्या शौर्याचे नवे पुरावे

शिवरायांची शौर्यगाथा सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच शौर्याची साक्ष देणारे पुरावे पुरात्तत्त्व विभागाला रायगडावर सापडलेत. शिवरायांच्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वेगवेगळ्या शस्त्रांचे अवशेष रायगडावरच्या साफसफाई दरम्यान हाती लागले आहेत.

Apr 11, 2012, 01:04 PM IST

शिवरायांच्या छत्रावरून शिवसेना आक्रमक

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी असो वा मेघडंबरीतील पुतळ्याचा विषय असो प्रत्येक वेळी किल्ले रायगड चर्चेत राहिला. गेल्या चाळीस वर्षांपासून असलेला किल्ले रायगडावरील शिवरायांचा पुतळा आता पुन्हा चर्चेत आलाय.

Apr 10, 2012, 12:52 PM IST

राष्ट्रवादी-शेकापातील संघर्षाने घेतला बळी

रायगड जिल्ह्यात रोह्यात अष्टमी गावात राष्ट्रवादी आणि शेकाप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Apr 7, 2012, 10:22 PM IST

रायगड दरोडा : दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

Apr 7, 2012, 06:59 PM IST

गणेशमूर्ती चोरी : ट्रस्टीच जबाबदार - गृहमंत्री

रायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Apr 5, 2012, 04:37 PM IST

वाळूमाफिया नितीन परबला अखेर अटक

रायगड जिल्ह्यातल्या रोह्याचा वाळूमाफिया नितीन परबला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पुणे रोडवर खालापूर जवळ त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल आणि गाडी जप्त करण्यात आली आहे.

Apr 5, 2012, 09:09 AM IST

वाळूमाफिया नितीन परब फरार

रायगड जिल्ह्यातल्या रोह्याचा वाळूमाफिया नितीन परब गेल्या दोन दिवसांपासून फरार आहे. परब याचा जामीनअर्ज माणगावच्या कोर्टानं फेटाळल्यानंतर त्यानं शरण येणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता नितीन परब फरार झाला आहे.

Apr 4, 2012, 08:29 PM IST

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.

Feb 29, 2012, 03:21 PM IST

कोकणने का बदल स्वीकारलेत?

सुरेंद्र गांगण

कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्ग. मात्र, या निसर्गावर लाकूड व्यापाऱ्यांनी घाला घालून निसर्गाची पैशासाठी लूट केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्मा जंगलभाग हा कोकणात होता. आता हे प्रमाण घटत आहे. हे सांगण्याचे कारण की, कोकणच्या वातावरणाला पोषक असे उद्योग आले नाही. मात्र, वातावरण बिघडविणारे प्रकल्प आणले गेलेत. यातून राजकारणही केलं गेलं, ते आजही सुरू आहे.

Feb 28, 2012, 07:31 AM IST

दरोडेखोऱ्यांच्या हल्ल्यात मुलगी ठार

महाडजवळील बिरवाडी येथे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात १४ वर्षीय मुलगी ठार झाली. या हल्ल्यात चार जण जखमी झालेत.

Feb 25, 2012, 12:21 PM IST

चित्रा पाटील यांची गरूडझेप

एमबीए झालेल्या शेकापच्या चित्रा पाटील यांनी विक्रमी ८ हजारांचे मताधिक्य घेत जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असला तरी त्यांचा ओढा हा राजकारणात नसून समाजकारणात आहे. समाजकारण करण्यासाठी त्यांनी राजकारणाचा हाताशी पकडले आहे. त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा ध्यास घेतला आहे.

Feb 24, 2012, 01:46 PM IST

रायगड जिल्ह्यात दरोडेखोरांचे थैमान सुरुच

रायगड जिल्ह्यात दरोड्यांचं सत्र सुरुच आहे. माणगावचे उपसरपंच राजेश मेहता यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकलाय. रिव्हॉल्व्हर आणि चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी साडेसहा लाखांचा ऐवज लुटला

Feb 8, 2012, 01:04 PM IST

उस्मानाबाद : नागरिक- पोलिसांमध्ये हाणामारी

उस्मानाबाद जिल्ह्यात मतदानाला हिंसक वळण लागलं आहे. नागरिक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. जहांगीरवाडी तांडा या गावात हा प्रकार घडला. पोलिंग एजंटच्या बसण्याच्या जागेवरून वादावादीला सुरुवात झाली आणि अखेरीस हाणामारीपर्यंत वाद गेला.

Feb 7, 2012, 02:43 PM IST

रायगड पोलीस भरती वादात

रायगडमधील पोलीस भरती वादाच्या भोव-यात सापडली आहे. पात्र उमेदवारांना डावलून जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना प्रवेश मिळाल्यामुळं संताप व्यक्त होतोय.

Nov 29, 2011, 10:46 AM IST

कुंपण खातंय शेत !

रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातल्या दिघी बंदराजवळ मोकळी असलेली ही ९० एकर जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. १९६२मध्ये सरकारनं समाजातल्या दुर्बल घटक म्हणून कोळी समाजाला ही जमीन व्यवसायासाठी दिली होती.

Nov 25, 2011, 08:39 AM IST