election

उरले अवघे काही तास... कार्यकर्त्यांची शेवटच्या क्षणीची धावपळ!

कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे... प्रचार अंतिम टप्प्यात पोहचलाय... प्रचारासाठी अवघे काही तास बाकी राहिलेत... मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.

Oct 30, 2015, 11:23 AM IST

उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरच्या सभेत पुन्हा भाजपवर निशाणा साधला

 आम्ही जर सत्तेत असलो तरी विकास होत नसेल तर आम्ही बोलणार. आम्ही जनतेला जी आश्वासन दिली आहेत. त्याची पूर्तता झाली आहे. कोल्हापूरचा टोलचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी सोडवला. राज्य सरकारने सोडविला नाही. भाजपने निवडणुकीच्या आधी खूप आश्वासने दिलीत. मात्र, निवडून आल्यानंतर त्याकडे पाठ दाखवलेय. प्रश्न काही सोडविलेले नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी आज कोल्हापुरात ढाण्या वाघ एकटा लढतोय, असे सांगितले.

Oct 28, 2015, 09:20 PM IST

कामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे

नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला. 

Oct 28, 2015, 08:22 PM IST

आमच्या मित्रांच्या पोटात दुखतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण डोंबिवलीचा विकास कोण करणार तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष करणार, गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीचं 'कल्याण' केले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला. 

Oct 28, 2015, 07:53 PM IST

एक बंदर, पोलिंग बूथ के अंदर!

एक बंदर, पोलिंग बूथ के अंदर!

Oct 28, 2015, 12:55 PM IST

कडोंमपा निवडणूक : गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार

गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार

Oct 28, 2015, 12:11 PM IST

निकाल लागेपर्यंत ओवैसींना कल्याणमध्ये नो एन्ट्री!

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारासाठी येऊ पाहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कल्याणमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. 

Oct 24, 2015, 05:49 PM IST

कोल्हापूरच्या मतदार राजाला नेमकं हवं तरी काय?

कोल्हापूरच्या मतदार राजाला नेमकं हवं तरी काय?

Oct 24, 2015, 05:38 PM IST

केडीएमसी निवडणूक : २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळतोय

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. निवडणुकींवर बहिष्कार टाकण्यावर ठाम असलेली संघर्ष समिती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे २७ गावांतील मतदार आणि इतर पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. अशातच संघर्ष समितीच्या या पवित्र्याचा शिवसेनेला फायदा होणार की नुकसान याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Oct 24, 2015, 11:03 AM IST