patangrao kadam

माळीण दुर्घटना : मृतांचा आकडा 82 वर, प्रचंड दुर्गंधी

माळीण गावात झालेल्या भुस्खलन आपत्तीत मृतांचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत 82 मृतदेह चिखलातून बाहेर काढण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जवळपास १०० लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, वाड्या-वस्त्यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Aug 2, 2014, 07:13 AM IST

मुंबई हायकोर्टाचा अजित पवार आणि पतंगरावांना दणका

मुंबई उच्च न्यायालयाची अजित पवार आणि पंतगराव क़दम यांना दणका. पंतगराव क़दम हे महसूल मंत्री असताना, पुण्यातील पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाच्या ताब्यात असलेली जागा हडपण्याचा या दोन्ही मंत्र्यांचा प्रयत्न होता. पण त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीये.

Jan 21, 2014, 08:40 PM IST

जळालेल्या फळबागांना सरकारचा ठेंगा

पूर्णपणे जळालेल्या फळबागांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारनं ठेंगाच दाखवल्याचं सत्य समोर आलंय. खुद्द राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांच्या बोलण्यातूनच हे सत्य उघड झालंय.

May 22, 2013, 11:09 PM IST

`राज आणि अजित पवारांमधील युद्ध दुर्दैवी`

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असणारे युद्ध दुर्दैवी असल्याची टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Mar 3, 2013, 07:44 PM IST

दुष्काळ निवारणासाठी २ हजार ६२५ कोटी

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.

Jul 12, 2012, 09:30 AM IST

वनमंत्र्यांच्या मुलाचं वनप्रेम वादात

औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात राज्याच्या वनमंत्र्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी अभयारण्याचे नियम मोडीत काढत मेळावा साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनकर्मचा-यांदेखत हे सर्व घडलं... एव्हढंच नाही तर वनकर्मचाऱ्यांनीदेखील कदम यांच्या या ‘सत्कार्याला’ हातभार लावला.

Jun 19, 2012, 01:46 PM IST

योजना काँग्रेस सरकारच्या, प्रसिद्धी उद्घाटनकर्त्यांना

राज्यात सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या योजना काँग्रेस सरकारच्या असतात नाव मात्र उद्घाटन करणाऱ्या मंत्र्याचं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्ल्यात सुरु असलेल्या काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.

Jun 2, 2012, 07:14 PM IST

ताडोबात राज ठाकरे, पतंगराव आमने-सामने

गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. तर राज ठाकरेंच्या दौ-यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौ-यावर जाणार आहेत.

May 30, 2012, 09:45 PM IST

दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव

दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.

May 5, 2012, 09:18 PM IST