rain

घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशनची भिंत कोसळून १ ठार २ जखमी

शहरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, पावसामुळे रात्री घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशन भिंत कोसळून १ ठार तर २ जखमी झालेत.

Aug 30, 2017, 10:35 AM IST

पाणी ओसरतेय, मुंबई हळूहळू पूर्वपदावर

काल अतिवृष्टीमुळे ठप्प झालेले मुंबई आज पूर्वपदावर येताना दिसत आहेत. सखल भागात साचलेले पाणी ओसर आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरु झालेय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन रेल्वे कल्याणकडे रवाना होत आहेत. लोकल सेवा धिम्यागतीने सुरु आहे.

Aug 30, 2017, 09:10 AM IST

मध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.

Aug 30, 2017, 08:31 AM IST

गरज असेल तरच आज घराबाहेर पडा!

मुंबईला मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी शिरलेल्या पाण्याचा निचरा झालाय. त्यामुळे मुंबईतील वाहतूक पूर्वपदावर येती आहे.

Aug 30, 2017, 08:19 AM IST

मुंबईत रेकॉर्ड ब्रेक ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद

मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.

Aug 30, 2017, 07:53 AM IST

मुंबई-कोकणवर असलेले ढगाचे अच्छादन उत्तरेला, पावसाचा जोर ओसणार !

सकाळी सकाळी मुंबई आणि परिसराला दिलासा देणारी बातमी. उपग्रहानं दिलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई आणि उत्तर कोकणावर असलेलं ढगाचं अच्छादन आणखी उत्तरेला सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईतला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Aug 30, 2017, 07:36 AM IST

मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच

गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही.  रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. 

Aug 30, 2017, 07:21 AM IST

तब्बल ११ तासानंतर मुंबई लोकल पहाटेपासून पुन्हा सुरु

मंगळवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे ठप्प तब्बल ११ तास ठप्प असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा आज पहाटेपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.  

Aug 30, 2017, 07:09 AM IST

अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

मुंबईवर पावसाचे ढग अजूनही कायम आहेत. त्यामुळं पुढच्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्य़ांनी नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.

Aug 29, 2017, 11:21 PM IST