सूर्यामुळे होणार पृथ्वीचा अंत; 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही

एक ना एक एक दिवस पृथ्वीचा अंत होणार आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत संशोधकांनी मोठा दावा केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 5, 2023, 10:51 PM IST
सूर्यामुळे होणार पृथ्वीचा अंत; 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही  title=

Death of Earth : एक दिवस पृथ्वीचा अंत होऊन  जगाचा विनाश होणार आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होईल यावर संशोधक संशोधन करत आहेत. याबाबत अनेक दावे केले जात आहेत. मात्र, नविन संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे.  सूयामुळे  पृथ्वीचा अंत होणार आहे. 130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणार नाही असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. 

सूर्य पृथ्वीला गिळंकृत करणार

सूर्याच्या उत्क्रांतीमुळे आपली सौरमाला निर्माण झाली. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि उर्जेमुळे सूर्यमालेतील सर्व ग्रह त्याच्याभोवती लयबद्ध पद्धतीने फिरत आहेत. पण, आपल्या सूर्यमालेत जीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच आहे. 450 कोटी वर्षांनंतर पृथ्वीचा अंत होईल. सूर्य आगीचा गोळा होईल. सूर्यावरील  हायड्रोजन, संपेल. सूर्यावरील न्यूक्लियर फ्यूजन संपेल. सूर्यावरील न्यूक्लियर फ्यूजन संपल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या दबावाखाली सूर्यामधील हेलियम कोर लहान होईल. परिणमाी तापमानात वाढ होत राहील. या उष्णतेमुळे सूर्याच्या बाहेरील प्लाज्मा थर संपुष्टात येईल. सूर्य गुरुत्वाकर्षण शक्तीने सूर्यमालेतील ग्रह खेचून घेईल. याच शक्तीने सूर्य पृथ्वीला देखील गिळंकृत करेल. 

130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत

सूर्याने पृथ्वीला गिळंकृत करण्याआधीच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत होईल. 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही. पृथ्वीच्या तापमानात भयानक वाढ होईल. पृथ्वीवरील एकही सजीव उष्णता आणि आर्द्रता सहन करु शकणार नाही. पृथ्वीवरील सर्व महासागरांची वाफ होईल. सूर्याचा प्रकाश सध्याच्या तुलनेत 20 टक्क्यापेक्षा अधिक प्रखर असेल. हा सूर्य प्रकाश डोळ्यांना सहन होणार नाही. मनुष्यच नाही तर पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेले लाखो जीव मरुन जातील असे वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉक्टरेट संशोधक रॉडॉल्फो गार्सिया यांनी म्हंटले आहे. पृथ्वीवर विनाशकारी नैसर्गिक घटना घडतील. सूर्यात होणाऱ्या बदलामुळे हे सर्व घडेल असा दावा संशोधकांचा आहे. 

पृथ्वीच्या विनाशास मनुष्यही कारणीभूत

पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य आहे. मात्र, मनुष्य देखील पृथ्वीच्या विनाशापासून स्वत:चा बचाव करु शकत नाही. पृथ्वीच्या विनाशाला काही अंशी मनुष्य देखील जबाबदार आहे. मनुष्य  स्वत:च्या कृतीने जीवसृष्टीच्या विनाशास कारणीभूत ठरणार आहे. येत्या काही शतकांत हवामानात कमालीचे बदल होणार आहेत. परिणामी श्वास घेण्यायोग्य हवा शिल्लक राहणार नाही. तसेच पाणी पिण्यास योग्य राहणार नाही. अणुयुद्धात माणसे मारली जातील.