Health News: सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही का? सावध व्हा, नाहीतर...

Avoid Skiping Breakfast: ब्रेकफास्ट (breakfast) हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. आदल्या दिवशी आपण रात्री जेवतो आणि शतपावली केल्यानंतर आपण झोपी जातो त्यातून सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला जोरदार भुक लागते. 

Updated: Nov 29, 2022, 06:49 PM IST
Health News: सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही का? सावध व्हा, नाहीतर...  title=
Avoid Skiping Breakfast

Avoid Skiping Breakfast: ब्रेकफास्ट (breakfast) हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. आदल्या दिवशी आपण रात्री जेवतो आणि शतपावली केल्यानंतर आपण झोपी जातो त्यातून सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला जोरदार भुक लागते. ही सणसणीत भूक (hunger) अगदी साहजिकच आहे कारण सात ते आठ तास आपलं पोट हे रिकामं असतं. ही भुक लागणं अगदी नैसर्गिक आहे यावरूनच तुम्हाला लक्षात येते की आपल्याला सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्ट आपण काय आणि कसा केला पाहिजे. मुख्यत्वे आपण आपल्या न्याहारीत चविष्ट आणि हेल्थी (healthy breakfast) गोष्टींचा वापर करतो. ब्रेकफास्ट हा पोटभर असणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्यालाही आपल्या दिवसाची आणि कामाची सुरूवात करण्यासाठी ब्रेकफास्टची गरज असते आणि तोही आरोग्यदायी आणि पोटभर. (health news stop skiping your breakfast in the morning otherwise you will have bad impacts)

ब्रेकफास्टचे हे मुख्य फायदे असले तरी अनेकजण ब्रेकफास्ट न करताच आपल्या दिवसाची सुरूवात करतात. पोटभरून आणि हेल्थी ब्रेकफास्ट करणं आवश्यक आहे हे त्यांना माहिती असूनही लोकं याकडे दुर्लक्ष करतात. आजकाल सगळ्यांच्याच प्रायोरिटीज बदल्या आहेत. अनेक जणांच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे (lifestyle) सगळेच जण आपल्याला गोष्टींना वेगळ्या पद्धतीनं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कामाच्या तणावामुळे लोकं उशीरा तर जेवत आहेतच परंतु त्यातून ते आपल्या आरोग्याकडेही लक्ष न देता सकाळचा ब्रेकफास्टही करत नाहीयेत. तुम्हाला माहितीये का की ब्रेकफास्ट स्किप केल्यानं तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतात. 

हेही वाचा - सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांचा मोठेपणा; सुनावणी दरम्यान मराठीतून साधला संवाद

काय आहेत तोटे?

न्याहारी हे आपल्या आहारातील सर्वात महत्वाचे जेवण आहे. जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर तुम्हाला गंभीर समस्या उद्भवू शकतात. असं म्हटलं जातं की नाश्ता न केल्याने तुमचे हृदय चांगल्या प्रकारे काम करत नाही. ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या देखील असू शकतात. याशिवाय तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या देखील असू शकतात. नाश्ता न करण्याचे काय तोटे आहेत?

  • जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांचा रक्तदाब सामान्यपेक्षा जास्त राहू लागतो ज्यामुळे धमन्यांच्या (blood pressure) रक्तप्रवाहावर परिणाम होतो. म्हणूनच नाश्ता चुकूनही वगळू नये.
  • न्याहारीकडे दुर्लक्ष केल्यास मधुमेह (diabetes) होण्याची शक्यता वाढते. हा त्रास नोकरदार लोकांना जास्त येतो.
  • जर तुम्ही नाश्ता वगळलात तर तुम्हाला दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात जास्त भूक लागते आणि तुम्ही जास्त संतृप्त चरबी, कॅलरी (calories) आणि साखर (sugar) खातात. त्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. 
  • जर तुम्ही दिवसाची सुरुवात नाश्त्याने केली नाही तर तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणजेच तुम्ही देखील कॅन्सरचा बळी होऊ शकता. म्हणूनच नाश्ता कधीही वगळू नये. 
  • जेव्हा तुम्ही नाश्ता वगळतो तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि त्यामुळे रक्तदाब (headache) आणि डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे त्याचा नाश्ता वगळण्यास विसरू नका.
  • जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवते आणि तुमचा मूडही (mood swings) चांगला राहत नाही. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)