'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'

Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरु असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल अशा सगळीकडे पावसाचं पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 17, 2024, 03:38 PM IST
'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'

Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून शहरात पूर आला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल सगळं काही पाण्याखाली आलं आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि सतत पाऊस सुरु असल्याने स्थिती आणखीनच गंभीर होऊ लागली आहे. शहरांमध्ये पाणी साचत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. जेट एअरवेजचे माजी सीईओ संजीव कपूर यांनी ही तुलना चुकीचं असल्याचं म्हटलं असून याचं कारणही सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आनंद महिंद्रांची पोस्ट

आनंद महिंद्रा यांनी दुबईतील पूरस्थिती दर्शवणारा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'नाही, मुंबई नाही दुबई आहे'. यावर संजीव कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुबई अशा वादळी पावसाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली नाही. ज्याप्रमाणे बर्फवृष्टीची सवय असलेली शहरं डिझाऊन करण्यात आली आहे असं संजीव कपूर म्हणाले आहेत. 

संजीव कपूर यांनी म्हटलं आहे की, "चुकीची तुलना आहे. दुबई अशा पावसांचा सामना करण्यासाठी उभारण्यात आलेली नाही. पाऊस ज्यामुळे शहरं जलमय होतील. यापेक्षा तुलना करायची असेल तर मुंबईत जोरदार बर्फवृष्टी झाली तर अशी होऊ शकते. मुंबई अशा बर्फवृष्टीचा सामना करेल अशा पद्धतीने उभारण्यात आलेली नाही. बर्फाळ ओस्लोमधील लोक मुबंईची थट्टा करतील का?".

दरम्यान संजीव कपूर यांनी आनंद महिंद्रांना दुबईवर टीका करण्याच्या हेतूने ही पोस्ट केली नसावी असंही स्पष्ट केलं आहे. तथापि, दुबईच्या पायाभूत सुविधा उभारताना पावसाचा किंवा प्रतिकूल हवामानाचा विचार करण्यात आला नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

"पोस्ट पुन्हा एकदा वाचली असता, ती दुबईची खिल्ली उडवणारी नाही असं दिसत आहे. पण मुद्दा तोच आहे की, दुबई मुसळधार पावसाचा सामना करेल अशाप्रकारे उभारण्यात आलेली नाही. मग पावसाचा स्त्रोत काहीही असो. कोणत्याही टोकाची हवामान परिस्थिती हाताळण्यासाठी शहरं उभारणं अव्यवहार्य ठरेल"

नेटकऱ्यांकडूनही संमिश्र प्रतिक्रिया

आनंद महिंद्रा यांच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी दुबईची स्वच्छता, तयारी याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मुंबईने पावसाचा सामना करण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेचा दाखला दिला आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More