'पीएम मोदींनी आर्थिक सुधारणांत अटल बिहारी, मनमोहन सिंग सरकारला टाकले मागे'

अमेरिकेतील एक प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिलाय. त्यामुळे कमी कालावधीत मोदी सरकारने ३७ क्षेत्रात मोठी सुधारणा केलेय. ही कामगिरी तीन वर्षांत केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 18, 2017, 05:53 PM IST
 'पीएम मोदींनी आर्थिक सुधारणांत अटल बिहारी, मनमोहन सिंग सरकारला टाकले मागे' title=

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एक प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिलाय. त्यामुळे कमी कालावधीत मोदी सरकारने ३७ क्षेत्रात मोठी सुधारणा केलेय. ही कामगिरी तीन वर्षांत केलेय.

अमेरिकी थिंकटँक सेंटर फॉर स्ट्रॅटजिक अण्ड इंटरनॅशनल स्टडीजचे वरिष्ठ सल्लागार आणि यूएस-इंडिया पॉलिसी स्टडीजचे वाधवानी चेअर रिचर्ड एम रोसोने सांगितले, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार अभ्यास आणि अमेरिका-भारत धोरण अमेरिकेच्या अग्रगण्य थिंक टँक विचार केंद्र वाधवानी चेअर रिचर्ड एम रोसो अभ्यासातून असे म्हटले आहे की, बाह्य घटक आणि भारतातील विदेशी गुंतवणूक चालना मिळाली आहे. परकीय गुंतवणुकीला सरकारने केलेल्या सुधारणा आणि खुले केलेले धोरण, यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळून यात वाढ झालेय. यामुळे विदेशात परदेशी गुंतवणुकीला प्रोसाहन मिळालेय. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे.

रोसोने एका पत्रात म्हटलेय, ''मोदींचा कार्यकाळात नजर टाकली तर भारतात अलीकडे थेट विदेशी गुंतवणूक जलद गतीने झाली आहे. आधीच्या अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या कालावधीपेक्षा जास्त आहे.  भारत परदेशी गुंतवणूक सरकारी आधारभूत धोरणामुळे वाढलेय. २५ वर्षांच्या कालावधीत भारतात विदेशी  गुंतवणूक ही १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा विचार करता ती अधिक आहे. 

अटलबिहारी वाजपेयी सरकारने आपल्या सहा वर्षांत भारतात गुंतवणुकीसाठी २९  क्षेत्रात सुधारणा झाल्यात तर मनमोहन  सिंग सरकारच्या कालावधीत पहिल्या कार्यकालात १९ आणि दुसऱ्या कालावधीत १८ क्षेत्रात सुधारणा केल्या गेल्यात. मात्र, मोदींना तीन वर्ष लागले पण ३७ क्षेत्रात सुधारणा झाल्याचा ऐतिहासिक बाब आहे.