द. आफ्रिका दौरा : विराट कोहलीची बीसीसीआयवर सडेतोड तोफ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी खास बीसीसीआयला हे बोल सुनावलेत. तसेच बीसीसीआयच्या नियोजनावर तोंडसुख घेतलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 23, 2017, 05:09 PM IST
द. आफ्रिका दौरा : विराट कोहलीची बीसीसीआयवर सडेतोड तोफ title=
विराट कोहली (IANS)

नागपूर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांने अति क्रिकेटबाबत भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) खडे बोल सुनावलेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी खास बीसीसीआयला हे बोल सुनावलेत. तसेच बीसीसीआयच्या नियोजनावर तोंडसुख घेतलेय.

 किमान वेळ मिळाला पाहिजे

सध्या टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे.कसोटीनंतर तीन सामन्यांची वन-डे आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेचा दौऱ्यावर जाणार आहे. सततच्या या मालिकांमुळे खेळाडूंना तयारीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तयारीसाठी किमान वेळ मिळाला पाहिजे, असे विराट कोहली यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेय.

खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम

विराट म्हणाला, कोणत्याही मालिकेच्या तयारीसाठी किमान एका महिन्याचा वेळ मिळायला हवा. मात्र, तो मिळत नाही. नाईलाजानं आम्हाला मिळेल त्या वेळात तयारी करावी लागते. या साऱ्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतोय,  अशी खंत व्यक्त त्याने केली. 

दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याआधी आमच्या हातात केवळ दोन दिवस आहेत. आमच्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. या दोन दिवसांत आम्हाला सर्व तयारी करावी लागणार आहे. सध्या श्रीलंका मालिका सुरु आहे. आणि स्वत:ला फिटही ठेवावं लागणार आहे, असे विराटने बोलून दाखवले.

क्रिकेट खेळाचे वेळापत्रक टाईट आहे. कोणताही परदेश दौरा असला तर अन्य संघ तयारीसाठी खूप वेळ घेतात. याउलट टीम इंडियाची स्थिती आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर बोलेल जाते. वेळप्रसंगी  टीकाही केली जाते. मात्र, वेळ नसेल तर खेळाडू तरी काय करणार, असे थेट सवाल विराटने यावेळी उपस्थित केला.