भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत असल्याचं मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मांडलं आहे. तसंच लोकांना याचा फारसा विचार करु नये असंही म्हटलं आहे. न्यूझीलंविरोधातील कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकही मोठी खेळी करता आली नाही. भारताने न्य़ूझीलंडविरोधातील मालिका 0-3 ने गमावली असून लाजिरवाणा पराभव झाला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 147 धावांची गरज असताना रोहित शर्मा, विराट कोहली संघाला विजयी करतील अशी खेळी करण्यास असमर्थ ठरले. न्यूझीलंडविरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेत दोघेही कमनशिबी ठरले आणि यामुळे स्थिती आणखी वाईट झाली असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.
"तुमचे सर्वोत्तम खेळाडूही वाईट काळातून जातात. तिन्ही सामन्यात फलंदाजी करण्यासाठी अनुकूल खेळपट्टी नव्हती. येथे फलंदाजी करणं फार सोपं नव्हतं. यामध्ये फक्त बंगळुरुमधील दुसऱ्या डावातील खेळी वगळावी लागेल. कधीतरी तुम्हाला नशिबाची साथ लागते. जसं की तुम्ही पहिली चूक करता आणि चेंडू स्टम्पच्या जवळ जातो. कोणीतरी कॅच सोडतं, एलबीडब्ल्यूचा निर्णय तुमच्या बाजूने जातो. हे सगळं घडत असतं. पण जेव्हा तुमचा वाईट काळ सुरु असतो तेव्हा या सर्व गोष्टी तुमच्या विरोधात जातात. कोणीतरी सर्वोत्तम झेल घेतो, कोणीतरी सर्वोत्तम चेंडू टाकतं. मी याबाबत फार विचार करणार नाही," असं सुनील गावसकर म्हणाले आहे.
भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिकेआधी दुलीप ट्रॉफी खेळायला हवी होती असं मतही सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. सराव करणं भारतीय संघासाठी फार महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. "त्यांनी थोडा सराव करायला होता. हे नक्की फार मोठं अंतर होतं. आपण बांगलादेशचा पराभव केला असल्याने न्यूझीलंडविरोधात सहज विजय मिळवू असं वाटलं होतं". पुढे ते म्हणाले "पण नक्कीच न्यूझीलंड संघाकडे भारतात आणि आयपीएलमध्ये खेळाडूंहसह चांगलं आक्रमण होतं. त्यांना भारतीय खेळपट्टी कशी आहे याची कल्पना आहे".
"हे आता विसरुन जा इतकंच मला सांगायचं आहे. एक वाईट स्वप्न समजून हे विसरुन जा. ऑस्ट्रेलियावर लक्ष केंद्रीत करा. सराव करा आणि सलग तिसऱ्यांदा जिंकण्याचा हेतू मनात ठेवा. मग तुम्ही 1-0, 2-0,2-1 कसंही जिंका. यामुळे भारतीय प्रेक्षकांची नाराजीही दूर होईल," असं ते म्हणाले आहेत.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
MI
(20 ov) 199/5
|
VS |
GT
100(15.5 ov)
|
| Mumbai Indians beat Gujarat Titans by 99 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MI
(20 ov) 199/5
|
VS |
GT
100(15.5 ov)
|
| Mumbai Indians beat Gujarat Titans by 99 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(18.5 ov) 122/8
|
VS |
UAE
78/4(8.5 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 6 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.