kdmc polls

केडीएमसी अपडेट : सेना-भाजपला हवी काँग्रेसच्या 'हाता'ची साथ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षपणे मदत करावी म्हणून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना हाताच्या पंजाची साथ हवी आहे. त्यासाठी भाजप-सेनेच्या नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला आहे.

Nov 6, 2015, 07:09 PM IST

कल्याण-डोंबिवलीत आता शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव

कल्याण डोंबिवलीत सत्तेची रस्सीखेच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने शिवसेनाला दिलेल्या प्रस्तावानंतर आता शिवसेनेने युती करण्यासंदर्भात दुसरा प्रस्ताव भाजपकडे पाठविला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

Nov 6, 2015, 02:41 PM IST

उद्धव ठाकरे म्हणणार का राजला 'हॅलो ब्रदर'

कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापनेवरून सध्या रणकंदन सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे पुन्हा राज ठाकरे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. 

Nov 3, 2015, 06:51 PM IST

कोण आहेत केडीएमसीत १० गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक

कल्याण डोंबविलीत 120 जागांचे निकाल लागले, त्यात अनेक जणांच्या गळ्यात विजयाची माळ पडली पण असे काही नगरसेवक आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हाची नोंद आहे पण तरीही ते कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेत नगरसेवक म्हणून मिरविणार आहेत.  

Nov 3, 2015, 04:14 PM IST

दिवस महत्त्वाचा- कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे अनुपस्थित

महापालिका निवडणूकीच्या निकालानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आलाय. 

Nov 3, 2015, 12:26 PM IST

विजयी उमेदवारांना अज्ञात स्थळी पाठवण्यास सुरुवात

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागला आणि आता घोडे बाजाराला उत आलाय. कारण नियमानुसार ११ नोव्हेबंर पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर बसवणे गरजेचे आहे. पण १० नोव्हेंबरला रविवार आणि ११ नोव्हेंबर पासून दिवाळी सुरु होत असल्याने ६ नोव्हेबंर रोजी बहुमत सिद्द करुन महपौर पदासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केलीये. 

Nov 2, 2015, 09:16 PM IST

पालिका निवडणुका : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी, भाजपाला धक्का

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींबरोबरच राज्यातील ५८ नगरपरिषदा निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सर्वाधिक १० नगरपरिषदा जिंकल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २१ नगरपरिषदा जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का दिला आहे. 

Nov 2, 2015, 07:22 PM IST

केडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा

महानगरपालिका निवडणुचा निकाल लागला. मात्र, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. पालिकेत त्रिशंकू अवस्था आहे. यापार्श्वभूमीवर विभागानुसार राजकीय पक्षांना त्या ठिकाणी किती जागा मिळाल्यात. कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहिले, याचा हा आढावा.

Nov 2, 2015, 06:53 PM IST

केडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय. 

Nov 2, 2015, 06:43 PM IST

केडीएमसी आणि कोल्हापूरात भाजपचा महापौर - दानवे

राज्यातील महापालिका तसेच नगरपालिका - नगरपंचायतींच्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली असून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.

Nov 2, 2015, 06:34 PM IST

निवडणूक निकालानंतर केडीएमसीवासियांना बॅड़ न्यूज

कल्याण डोंबिवली निवडणुकीचा निकाल लागताच राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली वासियांना मोठा झटका दिला आहे. आता दोन दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Nov 2, 2015, 05:52 PM IST

मुख्यमंत्र्यांसह भाजप ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत भाजपची पिछेहाट

एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येतायत. या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत पक्षाची पिछेहाट झाली आहे. 

Nov 2, 2015, 05:12 PM IST

मनसे चालेल, पण भाजपला बाहेर ठेवा - शिवसैनिक

 

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला यश मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी विजयाचा जल्लोष केला आहे. 

केडीएमसी हा तर ट्रेलर आहे, मुंबई-ठाणेचा पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात शिवसैनिकांनी केडीएमसी विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 2, 2015, 04:48 PM IST

शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला

कल्याण-डोंबिवलीतील राजकारण अधिक गढूळ झालेले पाहायला मिळाले. शिवसेना-भाजपने एकदम टोकाचा प्रचार केला. विकासाचा मुद्दा पाठिमागे पडला. दोघांनीही आम्हीच सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र, जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकताना त्यांची जागा दाखवून दिली. मनसेला नाकारलेच. मात्र, त्यांची भूमिका महत्वाची ठरलेय.

Nov 2, 2015, 04:25 PM IST