महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? पाहा...
कर्जमाफी केली तर तो काही शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल... नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु, केवळ कर्ज थकवणाऱ्यांना होणार याचा लाभ मिळेल, असं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विरोधकांची कर्जमाफीची मागणी फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप - शिवसेना सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'संरक्षण मंत्री' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी जवळ जाणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे.
पर्रिकर 'मुख्यमंत्री' म्हणून पाच वर्ष पूर्ण करणार?
संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत एकूण नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी, पर्रिकर यावेळी तरी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आपल्या पदावर कायम राहणार का? अशी चर्चा मात्र जोरात होती.
उत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे.
डुक्कर आडवं आल्यानं भीषण अपघात, 11 जण जागीच ठार
पुणे-सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच म्हणजे 11 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
LIVE : विधानसभा निवडणूक निकाल - यूपी,उत्तराखंडमध्ये भाजपला तर पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत, गोवा-मणीपूरमध्ये चुरस
गेल्या दोन महिन्यांपासून साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.
...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे
मुंबईत झालेला दारुण पराभव हा काँग्रेस पक्षाचा किंवा काँग्रेसच्या उमेदवारांचा नाही तर हा पराभव आहे संजय निरुपम यांचा... अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पराभवाचं खापर पक्षाच्या मुंबई अध्यक्षावर फोडलंय. ते नागपूरमध्ये बोलत होते.
मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला 'सात' दिली!
'तुमच्या राजाला साथ द्या' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईकरांना साद घातली खरी... पण, मनसेच्या आत्तापर्यंतच्या विविध धोरणांमुळे थोडा घोळच झाला... मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला साद देत 'साथ' दिली ती केवळ 'सात' जागांवर...
'निवडणुकीत झालं ते विसरून जायचं असतं'
निवडणुकीत जे झालं ते विसरून जायचं असतं, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
LIVE निकाल : इथे पाहा, जनतेनं कुणाला दिलाय कौल
राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहेत. थोड्याच वेळात जनतेनं या निकालात कुणाला कौल दिलाय, हे स्पष्ट होईल.