आमिर खानचं तिसरं लग्न? कुणाबरोबर? ते चर्चेत येण्यामागचं कारण काय?

अलीकडेच आमिर खानने पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतला.

Updated: Nov 21, 2021, 07:24 PM IST
आमिर खानचं तिसरं लग्न? कुणाबरोबर? ते चर्चेत येण्यामागचं कारण काय? title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अलीकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आणि लवकरच कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ऐवढेच काय तर आलिया भट आणि रनबीर कपुर देखील लग्न करणार आहे. त्यातच आता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे.

अलीकडेच आमिर खानने पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतला. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. त्यादरम्यान दोघांनीही आता आम्ही दोघे पती-पत्नी नसून सह-पालक आहोत आणि एकमेकांचे कुटुंब राहू, असे विधान त्यांनी वेगळं होताना केलं होतं. आमिर खान आणि किरण राव यांच्या या वक्तव्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

त्याचवेळी, आता सोशल मीडियावर चर्चा आहे की, आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे आणि तो पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न करु शकतो. असा दावा केला जात आहे की, आमिर खान त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' रिलीज झाल्यानंतर लग्नाची घोषणा करेल.

आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये रिलिज होणार आहे. त्यामुळे तो रिलिज झाल्यानंतर आमिर तिसरं लग्न करु शकतो असे नेटिझन्सचे म्हणणे आहे, ज्यामुळे या चर्चा होत आहेत.

हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलमध्ये आमिर चाहत्यांना त्याच्या लग्नाची माहिती देऊ शकतो, असे मानले जात आहे. इतकेच नाही तर असे ही म्हटले जात आहे की, आमिर खान त्याच्या एका को-स्टारसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

परंतु या गोष्टीवर आमिरने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे त्याच्या या तिसऱ्या लग्नाच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही असेच म्हणावे लागेल.

आमिरच्या घटस्फोटानंतर फातिमा सना शेख ट्रोल

आमिर खान आणि किरण राव यांच्या अचानक घटस्फोटानंतर अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर ट्रोल झाली. फातिमा आमिर खानसोबत 'दंगल' आणि 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटात दिसली होती. आमिर खान आणि फातिमा सना शेख रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र, हळूहळू ही अफवा शांत होत गेली.

आमिर खानचे दोन लग्न

आमिर खानने आतापर्यंत दोन लग्न केले आहेत. 1987 मध्ये अभिनेत्याने रीना दत्तासोबत पहिलं लग्न केलं. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर खानने किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. पण दोघांचे नातेही फार काळ टिकले नाही. आमिर खानला इरा खान, जुनैद खान आणि आझाद राव खान अशी तीन मुले आहेत.