Maharashtra Weather News : मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान आता खऱ्या अर्थानं परतीचा पाऊस राज्य व्यापताना दिसत असून या मोसमी पावसाची दुसरी इनिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर हिटमुळं उष्णता दिवसागणिक वाढत असतानाच दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागानं स्पष्ट करत इथं पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Monsoon Return Journey)
सध्या महाराष्ट्रातील नंदुरबार भागातून पावसानं काढता पाय घेतला असताना पुढील 48 तासांमध्येही बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात वाढता उकाडासुद्धा नाकारता येत नसून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळं ही स्थिती निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे.
अधिकृतरित्या सध्या राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पण, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्यामुळं बुधवार अर्थात 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर यादरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्या होणारी वातावरणनिर्मिती पाहता हवेच्या वरच्या स्थरात उष्ण आणि कोरडे उष्ण वारे बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये मिसळल्यामुळं ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी तापमानातील दाहकता आणखी वाढणार असून, सायंकाळी मात्र काही भागांवर पावसाचा शिडकावा पाहायला मिळू शकतो. IMD च्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण, त्या तुलनेत मात्र पावसाचं सरासरी प्रमाण कमी राहणार असल्याचंही आता आयएमडीकडून सांगितलं जात आहे.
सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातील हिमालयीन क्षेत्र आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये जेव्हाजेव्हा जास्त पावसाची हजेरी असते, तेव्हातेव्हा मध्य भारतात म्हणजेच महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पावसंच प्रमाण कमी होतं अशी माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.