IPL 2019: मुंबईने कोलकात्याला लोळवलं, पॉईंट्स टेबलमध्येही 'रोहित'सेना अव्वल

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ९ विकेटने पराभव झाला आहे.

Updated: May 5, 2019, 11:33 PM IST
IPL 2019: मुंबईने कोलकात्याला लोळवलं, पॉईंट्स टेबलमध्येही 'रोहित'सेना अव्वल title=

मुंबई : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ९ विकेटने पराभव झाला आहे. या पराभवामुळे कोलकात्याचं प्ले-ऑफमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे. मुंबई यंदाच्या मोसमात पॉईंट्स टेबलवर पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. तर हैदराबाद ही प्ले-ऑफमध्ये पोहोचलेली चौथी टीम ठरलेली आहे. आयपीएलच्या इतिहासात १२ पॉईंट्ससह प्ले ऑफ गाठणारी हैदराबाद ही पहिलीच टीम ठरली आहे. आता आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये मुंबईचा सामना चेन्नईशी होणार आहे.

कोलकात्याने विजयासाठी दिलेले १३४ रनचे आव्हान मुंबईने १ विकेट गमावून पूर्ण केले आहे. मुंबईकडून कॅप्टन रोहित शर्माने सर्वाधिक नाबाद ५५ रन केल्या. तर सूर्यकुमार यादवने नाबाद ४६ रन करत रोहितला चांगली साथ दिली.

कोलकात्याच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची चांगली सुरुवात झाली. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी ४६ रन जोडल्या. मुंबईला पहिला झटका क्विंटन डी कॉकच्या रुपात लागाला. डी कॉक ३० रन करुन आऊट झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकूमार यादवच्या सोबतीने रोहितने मुंबईला विजयापर्यंत पोहचवले. यो दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ८८ रनची पार्टनरशीप झाली.

याआधी मुंबईने टॉस जिंकत कोलकात्याला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर कोलकात्याने मुंबईला विजयासाठी १३४ रनचे आव्हान दिले आहे. कोलकाताने निर्धारित २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १३३ रन केल्या. कोलकाताकडून सर्वाधिक क्रिस लिनने ४१ रन केल्या. तर रॉबिन उथप्पाने ४७ बॉलमध्ये ४० रन केल्या. यातील २५ बॉलमध्ये उथप्पाला एकही रन काढता आली नाही. 

पहिल्यांदा बॅटिंग करताना कोलतकाताची आश्वासक सुरुवात झाली. शुभमन गिल आणि क्रिस लिनने पहिल्या विकेटसाठी ४९ रन जोडल्या. ७व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर शुभमन गिल आऊट झाला. त्याने ९ रन केल्या. मुंबई विरुद्धच्या मागील मॅचमध्ये गिलने दमदार अर्धशतकी खेळी केली.

गिल बाद झाल्यानंतर काहीच वेळात कोलकाताने दुसरी विकेट गमावली. क्रिस लिन ४१ रन करुन आऊट झाला. त्याला हार्दिक पांड्याने आऊट केले.

ओपनर जोडी माघारी परतल्यानंतर मैदानात उथप्पा आणि कॅप्टन दिनेश कार्तिक खेळत होते. कार्तिकला विशेष काही करता आले नाही. कार्तिक ३ रनवर असताना मलिंगाने आपल्याच बॉलिंगवर कॅचआऊट केले.

कार्तिक नंतर कोलकाताचा हुकमी एक्का आंद्रे रसेल मैदानात आला. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात स्फोटक खेळी करणारा रसेल पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्याला मलिंगाने आऊट केले. मुंबई विरुद्धच्या २८ मे ला झालेल्या मॅचमध्ये रसेलने ४० बॉलमध्ये ८० रनची तुफानी खेळी केली होती. रसेलनंतर कोलकाताने झटपट विकेट गमावल्या.

मुंबईकडून सर्वाधिक ३ विकेट मलिंगाने घेतल्या. तर हार्दिकने आणि बुमराहने प्रत्येकी २ विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.