2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार; जगात 5 शहर आधीच बुडाली

2050 हे वर्ष भारतासाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण, 2050 मध्ये मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 26, 2023, 10:04 PM IST
2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार;  जगात 5 शहर आधीच बुडाली  title=

Big Natural Disaster in 2050 : 2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार आहेत. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. भारतातील मुंबई आणि कोलकाता पूर्णपणे समुद्रात बुडणार आहेत. हे हवामान बदलामुळे होणार असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. क्लायमेट चेंजबाबतचा हा सर्वात मोठा दावा मानला जात आहे. 

मुंबई आणि कोलकाता शहराला मोठा धोका

क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यात  2050 मध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप होणार असल्याचा धोक्याचा इशारा देण्यात आलाय. या अंदाजानुसार भारतातील मुंबई आणि कोलकाता ही दोन मोठी शहर समुद्रात बुडणार आहेत. हवामान बदलामुळे हे घडणार असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. वातावरणातील बदलामुळे पृथ्वीवरील तापमानात कमालीचे बदल होत आहेत. हिमनद्या वितळू लागल्या आहेत. परिणामी मान्सूचे वेळापत्रक बदलले आहे.  कधी पूर येतो तर कुठे दुष्काळ पडतोय. याच  हवामान बदलामुळे भारतातील मुंबई आणि कोलकाता ही शहरे 2050 पर्यंत पाण्यात बुडतील असा दावा संशोधकांनी केला आहे. जलद गतीने होणारे शहरीकरण यामुळे मुंबई आणि कोलकाता येथील किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना पुराचा सर्वाधिक धोका आहे.

मुंबई आणि कोलकाता सह भारतातील या शहरांना देखील धोका 

मुंबई आणि कोलकातासह भारतातील आणखी काही शहरांना धोका आहे. सुरत, ओडिशा, केरळ, तामिळनाडू या शहरातील सुमद्र किनाऱ्यावर राहणाऱ्यांना देखील मोठा धोका आहे. 2050 पर्यंत समुद्र पातळी वाढल्याने 10 देशांची लोकसंख्येवर याचा प्रभाव होणार आहे. सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे. बांगलादेशातील 2.5 कोटी, चीनचे 2 कोटी आणि फिलिपाइन्सचे सुमारे 1.5 कोटी लोक यामुळे धोक्यात येणार आहेत. भारतातील मुंबई आणि कोलकाता, चीनमधील ग्वांगझू आणि शांघाय, बांगलादेशातील ढाका, म्यानमारमधील यंगून, थायलंडमधील बँकॉक आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी आणि है फोंग या शहरांना धोक्याचा इशराा देण्यात आला आहे. कोट्यावधी लोक बेघर होण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे. 

5 शहरी आधीच बुडाली

हवामान बदलामुळे आतापर्यंत जगातील पाच शहरे समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत. या शहरांमध्ये मोठ्या लोकसंख्येने लोक राहात होते. इजिप्तमधील थॉनिस हेराक्लियन शहर, इटलीचे बाया शहर, इंग्लंडमधील डरवेंट गाव, जमैकाचे पोर्ट रॉयल आणि अर्जेंटिनामधील विला अपेक्युएन क्षेत्र ही पाच शहरे समुद्रात बुडाली आहेत.