ज्याची पुस्तक विक्री जास्त; त्यालाच करा अध्यक्ष - राज

‘...याला मराठी साहित्य संमेलन आहे की कुस्तीचा आखाडा’ अशी टीका राज ठाकरेंनी साहित्य संमेलनाच्या राजकारणावर आणि नेहमीच्याच वादावर केलीय. सोबतच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते.

Oct 17, 2013, 08:05 PM IST

`महानामा` तून नामदेवांच्या कार्यावर प्रकाशझोत - कोत्तापल्ले

महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात संत ज्ञानदेव-नामदेवांनीच सुरू केली. संत नामदेवांनी तर समतेची, मराठीची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. `महानामा` या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी इथं व्यक्त केला.

Jan 14, 2013, 12:30 PM IST

संमेलनात नवोदितांना जास्त संधी - उषा तांबे

यंदाच्या साहित्य संमेलनात वेगळे प्रयोग केले गेले. विदेशी लेखकांना आणलं, मुलांसाठी कार्यक्रम आणि नवोदितांना जास्त संधी दिली, असा दावा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केला.

Jan 14, 2013, 11:32 AM IST

साहित्य संमेलनात `मराठी` समृद्धीसाठी ठराव

८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. या संमेलनात जवळपास सात ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषा आणि मराठी शाळा संर्वधनासाठी प्रयत्न करावेत. तर बेळगाव सीमा प्रश्न आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपाय-योजना करण्याचे सूचविण्यात आलेय.

Jan 13, 2013, 11:34 PM IST

साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले

मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा, असे प्रति आव्हान समारोप भाषणात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिले.

Jan 13, 2013, 07:57 PM IST

संमेलनाचा समारोप : मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्याची पाठ

चिपळुणातील ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप आज होत असताना समारोप सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे.

Jan 13, 2013, 05:31 PM IST

.....तुम्हीच आमची प्रेरणा - उद्धव ठाकरे

सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

Jan 13, 2013, 04:32 PM IST

'हस्तीदंती मनोऱ्यातील साहित्यिकांनी आत्मचिंतन करावं'

चिपळूणमध्ये सुरू असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं. उद्घाटनपर भाषणात पवारांनी साहित्यिकांना कधी चिमटा काढला तर कधी खडेबोल सुनावले.

Jan 11, 2013, 09:33 PM IST

जाहले संमेलनाचे उद्घाटन, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

मराठी मनाचा वेध घेणाऱ्या या गाण्याने मराठी साहित्य संमेलनाचे चिपळुणमध्ये उत्साहात उद्घाटन झाले.

Jan 11, 2013, 05:06 PM IST

साहित्य संमेलन वाद? `झी २४ तास`चं गाऱ्हाण, व्हय महाराजा...

साहित्य संमेलन आणि वाद असं राज्यात एक समीकरणच तयार झालं आहे. तरुण साहित्यापासून आणि संमेलनापासून दूर होताना दिसतायेत.

Jan 11, 2013, 11:37 AM IST

८६व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

साहित्य संमेलनाचा उत्साह चिपळुणात ओसंडून वाहतोय.. यातच चिपळुणकरांनी एक वेगळा अनुभव घेतला.. रस्त्यावर अचानक फ्लॅशमॉब करण्यात आला.

Jan 11, 2013, 08:54 AM IST

साहित्य संमेलनासाठी बेकायदा निधीचा वापर!

चिपळूण इथं होण्याऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jan 9, 2013, 01:00 PM IST

साहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी

चिपळूण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येतोय. आतापर्यंत संमेलनावर सव्वाकोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आयोजक प्रकाश देशपांडे यांनी दिलीय.

Jan 8, 2013, 07:04 PM IST

बाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे- शरद पवार

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात गैर काय, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. बाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे, असंही ते म्हणाले.

Jan 7, 2013, 11:53 PM IST

परशुरामांच्या वादात मराठा महासंघाचीही उडी

चिपळूण साहित्य संमेलनातील परशुरामाच्या वादात आता संभाजी ब्रिगेडपाठोपाठ अखिल भारतीय मराठा महासंघानंही उडी घेतलीय. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाचे चित्र काढून टाकण्याची मागणी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा महासंघाने केली आहे.

Jan 7, 2013, 08:05 PM IST

संमेलन : ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की

चिपळूण इथं होणा-या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लागलेलं वादाचं ग्रहण अजूनही संपत नाहीय. आता तर साहित्य संमेलनाची ओळख असलेली ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की संमेलन आयोजकांवर आलीय.

Jan 7, 2013, 10:30 AM IST

संमेलन व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव

चिपळुणातील साहित्य संमेलनाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. लेखिका पुष्पा भावेंनी बाळासाहेबांच्या नावाला काल विरोध केला होता. तर शिवसेनेनं कोण या साहित्यिक पुष्पा भावे असा प्रश्न विचारलाय. मात्र, या वादावर पडदा टाकत संमेलन स्वागताध्यक्ष सुनील तटकरे ठाकरे यांचेच नाव असेल असे स्पष्ट केलं.

Jan 7, 2013, 07:46 AM IST

परशुरामाचे चित्र, संभाजी बिग्रेडचा संमेलानाला विरोध

चिपळूण साहित्य संमेलन पुन्हा एकदा नव्या वादात अडकलं आहे.. परशुरामाच्या चित्रावरुन हा वाद रंगू लागला आहे.

Jan 5, 2013, 05:42 PM IST

बाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला देऊ नका - पुष्पा भावे

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याला साहित्यवर्तुळातून विरोध होऊ लागला आहे.

Jan 5, 2013, 05:10 PM IST

साहित्य संमेलनावरून राजकारण्यांचा तमाशा

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन निर्माण झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी भास्कर जाधवांनाही त्यांच्याच शब्दांत उत्तर दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

Dec 11, 2012, 10:06 PM IST