१९ मार्चला भारत वि. बांगलादेश क्वार्टर फायनल

वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना १९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.

Updated: Mar 13, 2015, 05:15 PM IST
१९ मार्चला भारत वि. बांगलादेश क्वार्टर फायनल title=

मेलबर्न : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना १९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.

साखळी सामन्यातील भारताचा अखेरचा सामना झिम्बावे विरूद्ध होणार आहे. या मॅचमुळे बी ग्रुपमधील पोझीशनमध्ये कोणताच फरक पडणार नाही. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला. त्यामुळे हे निश्चित होते. बांगलादेश पराभूत झाल्यास त्यांचा मुकाबला भारताशी होणार आहे. 

शुक्रवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेशच्या महमुदुल्लाह यांच्या सलग दुसऱ्या सामन्यातील शतकामुळे बांगलादेशने २८९ धावांचे आव्हान ठेवले. पण मार्टिन गुप्टीलच्या शतकाच्या जोरावर विजय मिळवला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.