गणपती उत्सव

मनसेच्या इशाऱ्यानंतर इंग्रजी शाळा नरमल्या!

काँन्वेंट शाळांना गणेशोत्सवाची पाच दिवसांची सुट्टी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलीय. काँन्व्हेंट शाळांना गणेशोत्सवात सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे मनविसे अधिक आक्रमक झाली आहे.

Sep 7, 2013, 03:00 PM IST

गणपती उत्सव : कोकण रेल्वेचे बुकिंग पुन्हा फुल्ल

कोकणात जाणा-या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अक्षरश दोन मिनिटांत फुल्ल झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या अनेक प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय.

Jul 31, 2013, 01:55 PM IST

कोकणच्या चाकरमान्यांना `मरे` पावली!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मध्य रेल्वे पावली आहे. गणेशोत्सवासाठी 4 ते 22 सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या 120 जादा फे-या यंदा धावणार आहे.

Jul 29, 2013, 11:46 PM IST

राज्यात गणरायाच्या आगमनाची लगबग

गणपतीबाबप्पा मोरयाच्या गजरात गणपती बाप्पा घरोघरी पोहचू लागले आहेत. गणरायाच्या आगमनाची लगबग घरोघरी दिसतेय. पुजेची तायरीही सुरु आहे. यासाठी बाजारपेठाही फुल्ल झाल्यायेत. गणेश भक्तांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी एकच गर्दी केलीये. गणेश भक्तांचा उत्साह अवर्णनिय असाच आहे.

Sep 19, 2012, 08:49 AM IST

बाप्पासाठी सजावट आणि रोषणाई

मुंबईकरांनी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी केली. बाप्पासाठी सजावट, रोषणाई , फुले आणि नैवेद्याच्या तयारीसाठी मुंबईकरांची दुकानांमध्ये झुंबड उडालेली दिसून आली. मुंबईत रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वाजत गाजत बाप्पाचे आज आगमन झाले.

Sep 19, 2012, 08:43 AM IST

गणेशोत्सवाची परंपरा

गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरूवात केली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

Sep 12, 2012, 10:39 AM IST

गणपतीत रात्रभर `वाजवा रे वाजवा`

गणपतीत रात्रभर वाजवा रे वाजवाचा संदेश दिला गेला आहे. तशी परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करतानाच, कायद्याचेही भान राखण्याचा संदेश राज्य सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना दिला आहे .

Sep 12, 2012, 08:51 AM IST

बाप्पा पावला, कोकणासाठी जादा रेल्वे

कोकणात मोठ्या उत्सहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी चाकरमानी गावाचा रस्ता धरतात. मात्र, यावेळी दोन महिने आधीच रेल्वेचे आरक्षण फुल झाले होते. त्यामुळे गावाला जायचे कसे, असा प्रश्न गणेश भक्तांना पडला होता. मात्र, हा प्रश्न निकालात निघाला आहे. कोकणात जाणा - या भाविकांच्यासुविधेसाठी मध्य रेल्वेने सीएसटी ते मडगाव मार्गासाठीदररोज ३८ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे .

Aug 9, 2012, 08:51 PM IST