दुष्काळ

दुष्काळासाठी राज्याची मलमपट्टी!

दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

May 16, 2012, 08:47 PM IST

कोंडाणे धरणाच्या कामावर हायकोर्टाचे ताशेरे

कोंडाणे धरणाच्या कामाबाबत उच्च न्यायालयानं सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. सरकारी खातं आणि ठेकेदारांमधील साटंलोटं यामुळे धरणाचा खर्च कोट्यवधी रुपयांनी वाढलाय. कोर्टानं सध्या कामाला स्थगिती दिलीय आणि पाच आठवड्यात प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत.

May 12, 2012, 10:38 PM IST

राज्यपालांकडे बोट, शरद पवार टीकेचे धनी

दुष्काळावरील पॅकेजच्या पहिल्या टप्प्याचा निधी पुढील आठ दिवसांत देणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी दिली. फेब्रुवारीत राज्यानं केंद्राकडं मागणी केलेल्या मदतीची पूर्तता होणार आहे. मात्र काल मागणी केलेल्या पॅकेजबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शरद पवारांना सर्वत्र टीकेचा 'सामना' करावा लागत आहे.

May 10, 2012, 09:22 AM IST

केंद्राने केली सरकारची घोर निराशा..

महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना केंद्राची भरीव मदत मिळेल ही अपेक्षा तुर्त तरी फोल ठरली आहे. दिल्लीत संसद भवनात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची पंतप्रधानांसोबतची बैठक संपली आहे.

May 8, 2012, 04:06 PM IST

राष्ट्रवादीवर कुरघोडी, CM भेटले PM यांना!

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी काँग्रेसकडून पंतप्रधानांना निवेदनही देण्यात आलं.

May 7, 2012, 10:00 PM IST

दुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले!

राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, आता या मुदद्यावर रस्त्यावरही रण पेटायला सुरुवात झालीय. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधाचा हा उद्रेक व्यक्त होऊ लागलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर रिपाईतर्फे मटकाफोड आंदोलन करण्यात आलय

May 7, 2012, 07:23 PM IST

एक कळशी पाणी दहा रुपयांना!

सुजलाम सुफलाम अशी ओळख असणा-या महाराष्ट्रात एक कळशी पाणी पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावं लागतंय.... ही कहाणी आहे जालन्यातली....या शहरात महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं.

May 7, 2012, 04:58 PM IST

दुष्काळासाठी राज्याचं केंद्राला साकडं!

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्राकडं 2 हजार 281 कोटी 37 लाख रुपय़ांच्या पॅकेजची मागणी केलीये. या पॅकेजचं स्वरुप काय असणार आहे.

May 7, 2012, 04:23 PM IST

दुष्काळावर राजकारण नको- आबा

ज्यावर दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती आली असताना साऱ्यांनी हातात हात घालून सामोर जाणं गरजेचं असतं. मात्र दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर विरोधक राजकारण करत असल्याची टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली आहे.

May 7, 2012, 09:55 AM IST

दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव

दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.

May 5, 2012, 09:18 PM IST

दुष्काळात '१३व्या'चे राजकारण

सुरेंद्र गांगण

महाराष्ट्रातील दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून दुष्काळाच्या प्रश्नावरुन राजकारण केले गेले आहे. दुष्काळ सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. केवळ दौरे करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राजकीय नेतेमंडळी करीत आहेत.

May 4, 2012, 09:44 AM IST

दुष्काळाचं राजकारण

महाराष्ट्रातील आजवर पडलेल्या दुष्काळावर नजर टाकल्यास 1896 - 1897 या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे...त्यावेळी अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला होता..1905-1906 या वर्षी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रेल्वेनं धान्य आणलं होतं...

May 3, 2012, 11:42 PM IST

सांगलीतील दुष्काळ जनावरांसाठी जीवघेणा

सांगली जिल्ह्यातला दुष्काळ आता जीवघेणा ठरू लागलाय. दूषित पाण्यामुळं पाच म्हशींचा मृत्यू झालाय. तर पाच जण अत्यावस्थ झालेत. त्यांच्यावर मिरजेतल्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

May 2, 2012, 05:58 PM IST

जळगावात पाणीटंचाई, बैठकीत खडाजंगी

राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीमुळं सरकारच्या तोंडचं पाणी पळालंय. जळगावात मात्र पाणीटंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचं आढळून आलंय. याबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय आला.

Apr 27, 2012, 04:49 PM IST

दुष्काळामुळे साताऱ्यात भीषण परिस्थिती

दुष्काळामुळे सातारा जिल्ह्यातल्या माण-खटावमधील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळं खरीप हंगाम वाया गेला. तर, परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं रब्बी हंगाम देखील हातचा गेला. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी जिद्दीनं डाळिंब, द्राक्षाच्या बागा फुलवल्या. मात्र आता पाण्याविना या बागाही जळू लागल्या आहेत.

Apr 22, 2012, 10:50 PM IST