लोकसभा निवडणूक

दादांचे निर्णय चुकले, अजित पवारांना घरचा आहेर

मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोर जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित व्हायला लागलंय.

May 21, 2014, 07:16 PM IST

निवडणुका संपताच अंमली पदार्थांची तस्करी सुरु

लोकसभा निवडणुका संपताच मुंबईत ड्रग्जची पुन्हा एकदा तस्करी सुरू झालीय. माटुंग्यामध्ये अशाच एका आफ्रिकन तस्कराला पोलिसांनी अटक केलीय. त्यानं ड्रग्ज लपवण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली होती. पण चाणाक्ष मुंबई पोलिसांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला.

May 21, 2014, 07:00 PM IST

‘भारत-पाकदरम्यान क्रिकेट सामने बंद करा’

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएचं सरकार लवकरच आपापल्या जागा घेणार आहे... पण, यामुळे भारत-पाकिस्तानमधले क्रिकेट संबंध कायमचे संपुष्टात येणार का? हा प्रश्न निर्माण झालाय तो उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्यामुळे...

May 21, 2014, 12:25 PM IST

मुस्लीमांनी मोदींना विजय मिळवून दिला - आजम खान

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे समाजवादी पार्टी नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. मुस्लीम मतदारांनीच मोदींना विजय मिळवून दिला आहे, असे व्यक्तव्य आजम खान यांनी केलंय.

May 20, 2014, 11:25 AM IST

लोकसभा पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक

मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.

May 20, 2014, 09:26 AM IST

राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणक्यात विजय नोंदविल्यानंतर आज संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

May 17, 2014, 06:49 PM IST

राज ठाकरेंची औकात दिसली, पाच ठिकाणी डिपॉझिट जप्त

या निवडणुकीत माझी औकात दाखवून देतो, बघा कशी वाट लावतो, असा कडक इशारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपशेल तोंडावरच आपटलेत. लोकसभेसाठी राज्यात 10 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी निम्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेय.

May 17, 2014, 10:49 AM IST

पराभव मान्य, भाजपच्या मागणीला अर्थ नाही - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेचा कौल स्वीकारला. महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याच्या राज्य भाजपच्या मागणीला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

May 16, 2014, 04:35 PM IST

नारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.

May 16, 2014, 12:53 PM IST

धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रितपणे ममतांना निवडावं नेता - काँग्रेस

लोकसभा निडणुकांचे निकाल हातीच्या एक दिवस अगोदर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी इतर पक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवलाय.

May 15, 2014, 08:42 PM IST

16 मेच्या पार्श्वभूमीवर विजयी मिरवणुकांना बंदी

विजयी मिरवणुका काढण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मनाई करण्यात आलीय. 18 मे नंतर मिरवणुका काढण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलीय. दरम्यान, मुंबईत एकूण चार ठिकाणी मतमोजणी होणार असून सर्वच मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त लावण्यात आलाय.

May 14, 2014, 03:28 PM IST

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधीच करोडपती

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षात सोशल मीडियांचा प्रभाव प्रामुख्याने जाणवला. भाजपने ही ताकद ओळखून निवडणुकीसाठी ‘नरेंद्र मोदी फॉर पीएम’ अशी अनोखी मोहीम सुरु केली. या मोहिमेत एका विशिष्ट क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर भाजपच्या कॉलसेंटरमधून मतदारांशी थेट संपर्क साधला जायचा.

May 13, 2014, 07:52 PM IST

एक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.

May 13, 2014, 03:11 PM IST

`एक्झिट पोलनंतर संसदेत त्रिशंकू स्थिती असेल`

एक्झिट पोलचा निष्कर्ष काही असला, तरी यावेळी संसदेत त्रिशंकू स्थिती असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असला, तरी NDAला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज NCP प्रवक्ते नवाब मलिक यांनी वर्तवलाय.

May 13, 2014, 02:15 PM IST

देशातील राजकीय स्थिती कशी असेल, कोणाला किती जागा?

लोकसभा निवडणूक एकूण नऊ टप्प्यात पार पडली. आता 16 मे या दिवशीच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अनेक बॉलिवूडस्टार उतरले आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींची हवा केली गेली आहे. काँग्रेसचं काय होणार, आम आदमी पार्टी काय चमत्कार करणार याची चर्चा रंगत आहेत. तर महाराष्ट्रात मनसे खाते खोलणार का, दक्षिणेकडे नवे तेलंगणा राज्य आणि अन्य राज्यांत काय होणार याची उत्सुकता आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममतांना कौल मिळणार की डावे आघाडी घेणार याचीच जोरदार चर्चा आहे. उत्तर प्रदेशकडे सर्वाधिक 80 जागा असल्याने कोणाला किती जागा मिळतात याची उत्सुकता शिगेला आहे.

May 13, 2014, 09:58 AM IST