शेतकरी

शेतकऱ्यांनो पेरण्या करु नका, केंद्र सरकारची बैठक

जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय. 

Jun 26, 2014, 07:21 PM IST

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे

अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.

Jun 23, 2014, 01:41 PM IST

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. काल सकाळपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं शहरवासी सुखावले. पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

May 28, 2014, 09:46 AM IST

रायगडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी वडखळ जवळील खाडी लगतच्या गावांतील शेतकरी, मच्छीमार महिला पुरुषांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार आणि जे एस डब्लू इस्पात कंपनी विरोधात प्रखरतेने रस्तारोको आंदोलन केले.

May 21, 2014, 07:35 PM IST

गारपिटग्रस्तांच्या यादीत खासदार जया बच्चन

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीचा सिने अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांना फटका पडला आहे.

May 1, 2014, 01:56 PM IST

सरकारची मदत तुटपुंजी, शेतकरी संतापले

खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

Mar 20, 2014, 04:42 PM IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर

शेकडो कोटींचं नुकसान झाल्यानंतर आणि अनेक शेतक-यांचे बळी गेल्यानंतर अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्या सत्ताधा-यांना जाग आली आहे.

Mar 19, 2014, 10:25 PM IST

'उमवि'च्या कुलगुरूंनी दिला शेतकऱ्यांना महिन्याचा पगार

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीला हात भार लावला आहे.

Mar 13, 2014, 06:46 PM IST

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

Mar 12, 2014, 08:56 PM IST

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

Mar 12, 2014, 07:15 PM IST

संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या

बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Mar 12, 2014, 07:08 PM IST

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

Mar 12, 2014, 03:47 PM IST

मुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.

Mar 10, 2014, 09:23 PM IST

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

Mar 4, 2014, 05:03 PM IST