शेतकरी

`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल

कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी प्रकरणी आरबीआयनं देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे.

Mar 7, 2013, 08:04 PM IST

शेतकरी कर्जमाफीवरून लोकसभेत गोंधळ

शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.

Mar 6, 2013, 08:00 PM IST

विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी

गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.

Dec 30, 2012, 09:18 PM IST

विधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे घेवून राज्यकर्त्यांचा निषेध केला. आज मंगळवारी नागपूर विधानसभेवर भाजप मोर्चा धडक देणार आहे.

Dec 11, 2012, 12:08 PM IST

कोल्हापूरला शेतकऱ्यांना गूळ कडू

गूळ व्यापा-यांच्या मनमानीमुळं शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव जाणिवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. गुळाचे भाव 2500 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.

Dec 4, 2012, 06:24 PM IST

शेतकऱ्यांचा वाली कोण?

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.

Nov 14, 2012, 04:38 PM IST

...नाही तर गाठ आमच्याशी आहे- राजू शेट्टी

चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.

Oct 28, 2012, 08:06 AM IST

शेतकऱ्यांसाठी शासनाचा वैरण विकास कार्यक्रम

दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

Oct 23, 2012, 09:13 AM IST

`झेंडूची फुले` शेतकऱ्यांच्या साथीला

पावसाअभावी फुलांचं उत्पादन घटल्यानं आवक कमी झाली पर्यायी यंदा फुलांना चांगला दर मिळतोय. दसरा आणि दिवाळीतही शेतक-यांना चांगले दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून दुष्काळात शेतक-यांना झेंडुनं चांगली साथ दिलीय. जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांना झेंडुला ३० ते ४० रुपये दर मिळाल्याने इथला शेतक-यांचे प्रयत्न यशस्वी झालेत.

Oct 22, 2012, 09:19 AM IST

पुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा

पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.

Oct 15, 2012, 05:02 PM IST

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

Sep 30, 2012, 08:24 AM IST

सन्मान... बळीराजाच्या सख्याचा!

बळीराजाचा जिवाभावाचा मित्र म्हणजे बैल... शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं दैवतच... बैलांचा सन्मान, कौतुक सोहळ्याचा सण म्हणजे पोळा... ग्रामीण भागातल्या मोठ्या उत्साहानं हा सण आज साजरा होतोय.

Aug 17, 2012, 04:39 PM IST

उदयनराजेंविरुद्ध शेतकऱ्यांना हवाय न्याय

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुन्हा आला. विवेक पंडित यांनी साता-यात महसूल खात्याच्या चुकीच्या धोरणाबाबत आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या अन्यायाविरोधात मोर्चा काढला होता.

Jul 17, 2012, 09:18 PM IST

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

काही दिवसांपूर्वी पावसाची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगून दिलासा देणा-या कृषी मंत्री शरद पवारांनी आता मात्र महाराष्ट्र, कर्नाटकातील कमी पाऊस ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलंय.

Jul 11, 2012, 10:35 PM IST

कष्ट अन् विज्ञानानं घडवला चमत्कार...

गरज ही शोधाची जननी असते त्यामुळेच बदल होतो आणि मग विकास... शेतीक्षेत्रात ही अशीच घोडदौड सुरु आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची गती वाढतेय. सांगली जिल्ह्यातही असाच एक बदल शेतकऱ्यांनी घडवून आणलाय.

Jul 10, 2012, 10:13 AM IST