शेतकरी

ही मनसेवर नामुष्की आहे का?

नाशिक शहराचा प्रारुप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आलाय. आक्रमक विरोधक आणि शेतकऱ्यांपुढं सत्ताधारी मनसेला अखेर माघार घ्यावी लागली. पालिकेच्या महासभेत ११ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौरांनी प्रारूप आराखडा रद्द करण्याची घोषणा केलीय.

Sep 24, 2013, 01:23 PM IST

कलावतीला घ्यायचीय राहुल गांधींची भेट!

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज विदर्भ दौऱ्यावर येतायत. त्यामुळं या दौऱ्यात त्यांच्या भेटीची आस यवतमाळमधील शेतकऱ्याची विधवा कलावती हिला लागलीय. नागपूर दौऱ्यात काँग्रेसच्या युवराजांना भेटण्याची इच्छा तिनं व्यक्त केलीय.

Sep 24, 2013, 10:53 AM IST

काँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग

काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.

Sep 18, 2013, 12:28 PM IST

शेतात आढळला चंदनाचा साठा!

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व इंदापूर तालुक्यातील बाभूळगावी एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर चंदनाचा साठा आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Sep 12, 2013, 08:32 PM IST

‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.

Sep 5, 2013, 10:07 AM IST

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा!

कांद्याने सध्या सगळ्यांचाच वांदा केलाय... कांद्याच्या किंमती भडकल्यानं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलंय... मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळं कांद्याची भाववाढ झाल्याचं तर्कशास्त्र कृषीमंत्री शरद पवार मांडतायत...

Aug 16, 2013, 07:56 PM IST

मावळ घटनेला २ वर्षं पूर्ण!

मावळ गोळीबाराची घटना 9 ऑगस्ट 2011 ला घडली. त्याला उद्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आंदोलन घडण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या.

Aug 8, 2013, 07:55 PM IST

शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

उस्मानाबादमध्ये शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. शासकीय चारा छावणी बंद झाल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन केलं..

May 15, 2013, 10:00 PM IST

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला, मोहोळ तालुक्यातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी विरोध केलाय.

May 14, 2013, 10:08 PM IST

शेतकऱ्याचा मुलगा जेईईचा टॉपर

शेतकऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे वेगळीच कमाल.

May 9, 2013, 03:19 PM IST

शेतकरी मागतोय सरकारकडे आत्महत्येची परवानगी

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी नसलं तरी या दुष्काळानं मात्र मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

Apr 8, 2013, 08:57 PM IST

दुष्काळावर शेतकऱ्याची नामी शक्कल !

दुष्काळामुळे बळीराजाची उरलीसुरलेली पिकंही करपून जात आहेत. मात्र सोलापुरातल्या एका शेतक-यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे.

Apr 4, 2013, 05:06 PM IST

कर्जमाफीचा घोटाळा

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

Mar 18, 2013, 11:30 PM IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.

Mar 18, 2013, 06:13 PM IST

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती

अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

Mar 10, 2013, 07:11 PM IST