शेतकरी

स्ट्रॉबेरी खायचीय... मग चला की, कोल्हापूरला!

स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर... पण आता महाबळेश्वरमध्ये मिळणारी उत्कृष्ठ दर्जाची स्ट्राबेरी कोल्हापूरातसुद्धा पिकतेय. ऐकून चकीत झालात ना... होय पण हे खरं आहे.

Feb 15, 2014, 08:42 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कृषीसंबंधी कार्यक्रमात विदर्भातल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातला शेतकरी थेट उभा राहून कापसाच्या दरावरून घोषणा देऊ लागला.

Feb 13, 2014, 11:06 PM IST

गुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Feb 5, 2014, 11:57 PM IST

शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी मातोश्रीवर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मातोश्रीवर पोहोचले आहेत. यामुळे महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश होईल का?, या चर्चेला उधाण येणार आहे.

Jan 7, 2014, 12:50 PM IST

येवल्यातील सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट

जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेनं दाखवून दिलंय. घरच्या अडचणीवर मात करुन ही ग्रामीण भागातली मुलगी आज पायलट झालीय. तिच्या या आकाश भरारीचा पाहू या या स्पशेल रिपोर्ट.

Dec 18, 2013, 07:54 PM IST

पोलिसांनी महिला आणि शेतक-यांना झोडपले

सांगली जिल्ह्यातल्या खंबाळे गावात एमआयडीसीसाठी जबरदस्तीने जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.. यावेळी महिला आणि शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली.खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एमआयडीसी मंजूर आहे. सुमारे पावणे पाचशे एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे.

Dec 8, 2013, 03:07 PM IST

बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी हजारो शेतकऱ्यांची सरकारी योजनेच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. तर या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी राका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Nov 29, 2013, 10:06 AM IST

ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

Nov 8, 2013, 10:49 PM IST

बटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार

कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.

Nov 6, 2013, 09:56 PM IST

शेतकऱ्यांचा ठेचा भाकर मोर्चा

विविध मागण्यांसाठी बुलडाण्यातल्या शेतकऱ्यांनी ठेचा भाकर आंदोलन केलं. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला सरकारकडून दिला जाणार हमीभाव अत्यंत कमी आहे.

Nov 3, 2013, 11:04 PM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?

देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.

Oct 30, 2013, 06:33 PM IST

एक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!

एक रुपयांत शेतक-याना पोटभर जेवण... हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल... खामगावची कृषी उत्पन्न बाजार समितीने हे करुन दाखवलंय..

Oct 16, 2013, 07:42 AM IST

निर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!

राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...

Oct 15, 2013, 09:24 AM IST

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

Sep 30, 2013, 06:28 PM IST

ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

धुळे जिल्ह्यातल्या न्याहळोद गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका 56 वर्षीय शेतक-यानं आत्महत्या केलीये. मधुकर कोळी असं त्यांचं नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि नापीकीचं संकट समोर दिसत असल्याने विष पिउन त्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.

Sep 29, 2013, 11:02 PM IST