उत्तराखंड

नेपाळी गुंडांकडून भाविकांवर अत्याचार आणि लूट

उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना नेपाळी गुंडांकडून हतबल भाविकांवर अत्याचार करण्यात येत असून मौल्यवान दागिन्यांची लूटही करण्यात आलेय.

Jun 21, 2013, 10:45 PM IST

राज्यातील धरणे धोकादायक, महापुराची भिती

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवला असेल... पण अशीच स्थिती आपल्या शहरात-गावात होऊ शकते, असं तुम्हाला सांगितलं तर..? राज्यातील धरणांची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे अनेक धरणं असुरक्षित बनली आहेत. झी २४ तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.

Jun 21, 2013, 09:46 PM IST

‘वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका’

उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना मदत मिळत नाही. तसेच अन्न-पाण्यावाचून दिवस काढावे लागत असल्याने आम्हाला वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका आणि उडवून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांने व्यक्त केलेय.

Jun 21, 2013, 06:14 PM IST

शत्रुघ्न सिन्हांनी उत्तराखंडला दिले ५० लाख

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून, अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ५० लाख रुपयांची मदत आज जाहीर केली आहे.

Jun 20, 2013, 07:39 PM IST

५२ हजार बेपत्ता, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवलाय. उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. अनेक जण दलदलीत अडकून पडलेत. काही जण मृतांजवळच आपला जीव मुठीत घेऊन गोठवणाऱ्या थंडीत आहेत. उपाशीपोटी हजारो पर्यटक अडकून पडलेत. आता उत्तराखंडमध्ये जलप्रलयानंतर आता मदतकार्य वेगानं सुरू झालंय. अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेय.

Jun 20, 2013, 07:08 PM IST

पुरानंतर..उपाशीपोटी `ते`गोठवणाऱ्या थंडीत

उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.

Jun 20, 2013, 06:31 PM IST

फोटो : केदानाथ पहिल्यांदा आणि आत्ता!

उत्तराखंडमधल्या जलप्रकोपानं केदारनाथला होत्याचं नव्हतं करून टाकलंय. सध्या केदारनाथ मंदिराचा गाभारा सोडून आणखी काहीही उरलेलं दिसत नाही.

Jun 20, 2013, 10:43 AM IST

पुरात अडकलेला भज्जी देतोय इतरांना दिलासा!

क्रिकेटर हरभजन सिंग सध्या पूरग्रस्त भागातील जोशीमठात अडकलाय. ‘आयटीबीपी’च्या कॅम्पनं त्याला तात्पुरता आसरा दिलाय.

Jun 20, 2013, 08:33 AM IST

गंगेचा प्रकोप, हजारोंचा जीव मुठीत

उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.

Jun 19, 2013, 07:21 PM IST

१० हजार जण सुरक्षित स्थळी - पंतप्रधान

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.

Jun 19, 2013, 07:07 PM IST

उत्तराखंड : राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू?

राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jun 19, 2013, 02:37 PM IST

केदारनाथ उद्ध्वस्त, पुरात हजारो बेपत्ता

गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय.

Jun 19, 2013, 01:55 PM IST

उत्तराखंड : लष्कराचं बचावकार्य सुरू

उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ६२ ते ७० हजार भाविक अडकल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी वर्तवलीय. पाच हजार भाविकांना सुखरुप वाचवण्यात यश आल्याचं शिंदेंनी माहिती दिलीय.

Jun 19, 2013, 01:45 PM IST

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

Jun 18, 2013, 09:47 AM IST

उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान, १० ठार

उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने कहर माजवला असून चारधाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे. प्रचंड पावसाचे १० लोक बळी गेलेत तर ५० हून अधिक लोक बेपत्ता झालेत. मुसळधार पावसाने सात मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली.

Jun 17, 2013, 12:08 PM IST